शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

वादळी वारे अन् गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: May 22, 2014 00:13 IST

उमरगा : वादळी वार्‍यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ या गावांतील शेकडो घरावरील पत्रे उडून गेले आहेत

उमरगा : वादळी वार्‍यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ या गावांतील शेकडो घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच विद्युत खांबही कोसळले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. गारांचा मार लागल्यामुळे तीन जण जखमी झाले. तसेच पत्रे लागून जनावरेही जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुधनाळ, कदमापूर, हंद्राळ, कुन्हाळी या गावांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस झाला. क्षणार्धातच अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे या भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हंद्राळ हे सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील जवळपास अडीचशे घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी घरात जाऊन धान्यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाराही भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे पशुपालकांनी सांगितले. दरम्यान, हंद्राळ परिसरात गारपीटही झाली. गारांचा मार लागून येथील मुकींद बोयणे, रघुनाथ सुरवसे, पंढरीनाथ हत्तरगे हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी व्यंकट कुंभार, बंडाप्पा मलकाप्पा बिराजदार, दत्तात्रय लिंबाजी हत्तरगे यांची जनावरे जखमी झाली आहेत. सदरील घटनेचा पंचनामा तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी विजय पाटील, तलाठी शिवराज पाटील, ग्रामसेवक गोपाळ घंटे, कृषी सहाय्यक सचिन सरपे यांनी बुधवारी दिवसभर नुकसानीचे पंचनामे केले. (वार्ताहर) दीडशे झाडे उन्मळून पडली वादळी वार्‍यामुळे तिन्ही गावांतील मिळून सुमारे दीडशे झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणचे विद्युतखांबही जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे सदरील गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासोबतच दळण-कांडपाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेकडो संसार उघड्यावर वादळी वार्‍यामुळे उडून गेलेल्या पत्र्यांची बुधवारी दिवसभर ग्रामस्थ दिवसभर जमवाजमव करताना दिसून येत होते. उडून गेलेल्यापैकी अर्धेही पत्रे हाती लागले नसल्याचे हंद्राळचे सरपंच रमेश हत्तरगे यांनी सांगितले. रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जिवाच्या भीतीने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. या भीतीपोटी ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.मंगळवारी रात्री गारपीट झाली होती. त्यामुळे सर्वत्र गाराच गारा साचल्या होत्या. सदरील गारांचे ढीग बुधवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दिसून येत होते. कालांतराने उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर गारा वितळल्या, असे ग्रामस्थांनी सांगितले.