शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना फटका

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला.

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला. काही खांब जमिनीवर कोसळले, तर काही वाकले. यात सर्वाधिक खांब कन्नड, पिशोर व वैजापूर या परिसरातील आहेत. परिणामी, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. कोसळलेल्या खांबांच्या जागेवर नवीन खांब बसविणे व वाकलेल्या खांब व वाहिन्यांच्या त्वरित दुरुस्तीचे काम महावितरणने हाती घेतले आहे.मृग नक्षत्राच्या सलामीलाच ९ जून रोजी रात्री सर्वदूर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर बरसलेल्या पावसाने जीटीएल व महावितरणच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून टाकली. कारण, वादळी वाऱ्यांनी लहान-मोठी झाडे कोलमोडून पडली. यातील काही झाडे विद्युत वाहिन्यांवर पडली. काही ठिकाणी विद्युत खांब खाली पडले, तर काही ठिकाणी अर्धवट वाकले. 1 ग्रामीण भागात उच्च दाब वाहिनीचा भार सांभाळणारे ७० खांब, तर लघुदाब वाहिनीचा भार पेलणारे २८८ खांब बाधित झाले. या ३५८ खांबांपैकी काही खांब उखडून पडले, तर काही खांब अर्धवट वाकले.2 यातही नुकसान झालेल्या खांबांपैकी पिशोर, कन्नड, वैजापूर या भागातील खांब अधिक आहेत. सुमारे ३८ लाख रुपयांची वीज यंत्रणेची हानी झाली आहे.3 यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले की, जिथे जिथे विद्युत पोल पडले आहेत तिथे नवीन पोल बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे खांब वाकले आहेत ते सरळ करून उभारण्यात येणार आहेत. 4 युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व खांबांची उभारणी करण्यात येईल व वाहिन्याही जोडण्यात येतील.