शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना फटका

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला.

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला. काही खांब जमिनीवर कोसळले, तर काही वाकले. यात सर्वाधिक खांब कन्नड, पिशोर व वैजापूर या परिसरातील आहेत. परिणामी, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. कोसळलेल्या खांबांच्या जागेवर नवीन खांब बसविणे व वाकलेल्या खांब व वाहिन्यांच्या त्वरित दुरुस्तीचे काम महावितरणने हाती घेतले आहे.मृग नक्षत्राच्या सलामीलाच ९ जून रोजी रात्री सर्वदूर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर बरसलेल्या पावसाने जीटीएल व महावितरणच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून टाकली. कारण, वादळी वाऱ्यांनी लहान-मोठी झाडे कोलमोडून पडली. यातील काही झाडे विद्युत वाहिन्यांवर पडली. काही ठिकाणी विद्युत खांब खाली पडले, तर काही ठिकाणी अर्धवट वाकले. 1 ग्रामीण भागात उच्च दाब वाहिनीचा भार सांभाळणारे ७० खांब, तर लघुदाब वाहिनीचा भार पेलणारे २८८ खांब बाधित झाले. या ३५८ खांबांपैकी काही खांब उखडून पडले, तर काही खांब अर्धवट वाकले.2 यातही नुकसान झालेल्या खांबांपैकी पिशोर, कन्नड, वैजापूर या भागातील खांब अधिक आहेत. सुमारे ३८ लाख रुपयांची वीज यंत्रणेची हानी झाली आहे.3 यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले की, जिथे जिथे विद्युत पोल पडले आहेत तिथे नवीन पोल बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे खांब वाकले आहेत ते सरळ करून उभारण्यात येणार आहेत. 4 युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व खांबांची उभारणी करण्यात येईल व वाहिन्याही जोडण्यात येतील.