शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरीची पुनरावृत्ती डोकेदुखी ठरेल ?

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

वहाबोद्दीन शेख, नायगाव बाजार गत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार

वहाबोद्दीन शेख,  नायगाव बाजारगत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार, याकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर विजयश्री मिळविली होती. माजी आमदार श्रीनिवास (बापूसाहेब) गोरठेकर यांचा त्यांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. परंतु आता पाच वर्षांच्या कार्यकाळात बरेच पाणी वाहून गेले आहे. आगामी निवडणुकीत मतदारसंघात होणारी बंडखोरी कशी रोखावी, असा कळीचा प्रश्न आ. चव्हाण यांच्यासमोर उभा राहणार आहे. हा प्रश्न किती दिवस चर्चेत राहील आणि त्याचा शेवट काय असेल, हे आगामी काळच सांगेल.सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण गरम होऊ लागल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभ आदी सार्वजनिक कार्यक्रमात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकामी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी उमरी, धर्माबाद आणि नायगाव या तीन तालुक्यांचा मतदारसंघ नव्याने निर्माण झाला. पहिले आमदार म्हणून चव्हाण यांना १२ उमेदवारांशी लढत द्यावी लागली होती. २०१४ च्या निवडणुकीत काय-काय घडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी आमदार कै. बळवंतराव चव्हाण यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध. बळवंतरावांनी पवारांचा कोणताही शब्द खाली पडू दिला नाही. त्यानंतर त्यांचे चिरंजीव वसंतराव चव्हाण यांनीदेखील वडिलांची परंपरा सुरु ठेवली. मात्र २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल या आशेने मतदारसंघ पिंजून काढला. परंतु पक्षाने चव्हाण यांच्याऐवजी गोरठेकरांना रिंगणात उतरविले. इथेच बंडखोरीची ठिणगी पडली. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या वतीने नायगावात शरद पवार, तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. मात्र अपक्ष चव्हाण यांनी ही निवडणूक ११ हजार १२० मतांनी जिंकली. काँग्रेसकडून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने मिळाली. तेव्हापासून आ. चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे ते प्रमुख दावेदार आहेत. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी वसंतराव-गोरठेकर-कुंटूरकर एका मंचावर आले होते. हे मनोमिलन विधानसभेपर्यंत टिकेल का? सध्याच राष्ट्रवादीकडून श्रीनिवास गोरठेकर, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश कुंटूरकर यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गत निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण ठक्करवाड चौथ्या क्रमाकांवर होते. बालाजी बच्चेवार यांनी जनसुराज्यकडून निवडणूक लढविली होती. ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. भाजपकडून श्रावण पाटील भिलवंडे, राम पाटील रातोळीकर, शंकर कल्याण, बालाजी बच्चेवार आदी इच्छुक आहेत. अपक्षवसंतराव चव्हाण ६३,५३४राष्ट्रवादी श्रीनिवास गोरठेकर ५२,४१४जनसुराज्यबालाजी बच्चेवार १६,६८८इच्छुकांचे नाव पक्षवसंतराव चव्हाण काँग्रेस श्रीनिवास गोरठेकर राष्ट्रवादीराजेश कुंटूरकर राष्ट्रवादीबालाजी बच्चेवार भाजपालोकसभा निवडणुकीत डी.बी. पाटील (भाजपा) यांना ३ हजार ८४६ एवढे मताधिक्य