शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

बंडखोरीची पुनरावृत्ती डोकेदुखी ठरेल ?

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

वहाबोद्दीन शेख, नायगाव बाजार गत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार

वहाबोद्दीन शेख,  नायगाव बाजारगत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार, याकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर विजयश्री मिळविली होती. माजी आमदार श्रीनिवास (बापूसाहेब) गोरठेकर यांचा त्यांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. परंतु आता पाच वर्षांच्या कार्यकाळात बरेच पाणी वाहून गेले आहे. आगामी निवडणुकीत मतदारसंघात होणारी बंडखोरी कशी रोखावी, असा कळीचा प्रश्न आ. चव्हाण यांच्यासमोर उभा राहणार आहे. हा प्रश्न किती दिवस चर्चेत राहील आणि त्याचा शेवट काय असेल, हे आगामी काळच सांगेल.सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण गरम होऊ लागल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभ आदी सार्वजनिक कार्यक्रमात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकामी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी उमरी, धर्माबाद आणि नायगाव या तीन तालुक्यांचा मतदारसंघ नव्याने निर्माण झाला. पहिले आमदार म्हणून चव्हाण यांना १२ उमेदवारांशी लढत द्यावी लागली होती. २०१४ च्या निवडणुकीत काय-काय घडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी आमदार कै. बळवंतराव चव्हाण यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध. बळवंतरावांनी पवारांचा कोणताही शब्द खाली पडू दिला नाही. त्यानंतर त्यांचे चिरंजीव वसंतराव चव्हाण यांनीदेखील वडिलांची परंपरा सुरु ठेवली. मात्र २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल या आशेने मतदारसंघ पिंजून काढला. परंतु पक्षाने चव्हाण यांच्याऐवजी गोरठेकरांना रिंगणात उतरविले. इथेच बंडखोरीची ठिणगी पडली. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या वतीने नायगावात शरद पवार, तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. मात्र अपक्ष चव्हाण यांनी ही निवडणूक ११ हजार १२० मतांनी जिंकली. काँग्रेसकडून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने मिळाली. तेव्हापासून आ. चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे ते प्रमुख दावेदार आहेत. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी वसंतराव-गोरठेकर-कुंटूरकर एका मंचावर आले होते. हे मनोमिलन विधानसभेपर्यंत टिकेल का? सध्याच राष्ट्रवादीकडून श्रीनिवास गोरठेकर, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश कुंटूरकर यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गत निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण ठक्करवाड चौथ्या क्रमाकांवर होते. बालाजी बच्चेवार यांनी जनसुराज्यकडून निवडणूक लढविली होती. ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. भाजपकडून श्रावण पाटील भिलवंडे, राम पाटील रातोळीकर, शंकर कल्याण, बालाजी बच्चेवार आदी इच्छुक आहेत. अपक्षवसंतराव चव्हाण ६३,५३४राष्ट्रवादी श्रीनिवास गोरठेकर ५२,४१४जनसुराज्यबालाजी बच्चेवार १६,६८८इच्छुकांचे नाव पक्षवसंतराव चव्हाण काँग्रेस श्रीनिवास गोरठेकर राष्ट्रवादीराजेश कुंटूरकर राष्ट्रवादीबालाजी बच्चेवार भाजपालोकसभा निवडणुकीत डी.बी. पाटील (भाजपा) यांना ३ हजार ८४६ एवढे मताधिक्य