शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बंडखोरीची पुनरावृत्ती डोकेदुखी ठरेल ?

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

वहाबोद्दीन शेख, नायगाव बाजार गत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार

वहाबोद्दीन शेख,  नायगाव बाजारगत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार, याकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर विजयश्री मिळविली होती. माजी आमदार श्रीनिवास (बापूसाहेब) गोरठेकर यांचा त्यांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. परंतु आता पाच वर्षांच्या कार्यकाळात बरेच पाणी वाहून गेले आहे. आगामी निवडणुकीत मतदारसंघात होणारी बंडखोरी कशी रोखावी, असा कळीचा प्रश्न आ. चव्हाण यांच्यासमोर उभा राहणार आहे. हा प्रश्न किती दिवस चर्चेत राहील आणि त्याचा शेवट काय असेल, हे आगामी काळच सांगेल.सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण गरम होऊ लागल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभ आदी सार्वजनिक कार्यक्रमात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकामी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी उमरी, धर्माबाद आणि नायगाव या तीन तालुक्यांचा मतदारसंघ नव्याने निर्माण झाला. पहिले आमदार म्हणून चव्हाण यांना १२ उमेदवारांशी लढत द्यावी लागली होती. २०१४ च्या निवडणुकीत काय-काय घडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी आमदार कै. बळवंतराव चव्हाण यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध. बळवंतरावांनी पवारांचा कोणताही शब्द खाली पडू दिला नाही. त्यानंतर त्यांचे चिरंजीव वसंतराव चव्हाण यांनीदेखील वडिलांची परंपरा सुरु ठेवली. मात्र २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल या आशेने मतदारसंघ पिंजून काढला. परंतु पक्षाने चव्हाण यांच्याऐवजी गोरठेकरांना रिंगणात उतरविले. इथेच बंडखोरीची ठिणगी पडली. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या वतीने नायगावात शरद पवार, तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. मात्र अपक्ष चव्हाण यांनी ही निवडणूक ११ हजार १२० मतांनी जिंकली. काँग्रेसकडून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने मिळाली. तेव्हापासून आ. चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे ते प्रमुख दावेदार आहेत. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी वसंतराव-गोरठेकर-कुंटूरकर एका मंचावर आले होते. हे मनोमिलन विधानसभेपर्यंत टिकेल का? सध्याच राष्ट्रवादीकडून श्रीनिवास गोरठेकर, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश कुंटूरकर यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गत निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण ठक्करवाड चौथ्या क्रमाकांवर होते. बालाजी बच्चेवार यांनी जनसुराज्यकडून निवडणूक लढविली होती. ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. भाजपकडून श्रावण पाटील भिलवंडे, राम पाटील रातोळीकर, शंकर कल्याण, बालाजी बच्चेवार आदी इच्छुक आहेत. अपक्षवसंतराव चव्हाण ६३,५३४राष्ट्रवादी श्रीनिवास गोरठेकर ५२,४१४जनसुराज्यबालाजी बच्चेवार १६,६८८इच्छुकांचे नाव पक्षवसंतराव चव्हाण काँग्रेस श्रीनिवास गोरठेकर राष्ट्रवादीराजेश कुंटूरकर राष्ट्रवादीबालाजी बच्चेवार भाजपालोकसभा निवडणुकीत डी.बी. पाटील (भाजपा) यांना ३ हजार ८४६ एवढे मताधिक्य