शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

बचेंगे तो और भी लडेंगे असं का नाही म्हणत?

By admin | Updated: August 13, 2014 01:44 IST

‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.

‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. भारतासारख्या देशात आता रोजच कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालूच असतात. किंबहुना हा देशच निवडणुकांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, अशा या देशात निवडणुका येतात... जातात, त्यात हार होते वा जीत होते. अशा वेळी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही भाषा शोभून दिसते. तमाम आंबेडकरी चळवळीची शान वाढविण्याऐवजी, कार्यकर्त्यांचा हौसला बुलंद करण्याऐवजी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा जाणता, दिग्गज नेता अशी निराशा पदरी का घेत आहे, हा खरा प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष कोणता, त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय यश मिळवले किंवा वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये या पक्षाची ताकद किती, हा प्रश्नही अलाहिदा; पण बाळासाहेब आंबेडकरांची खरी ओळख आहे, ती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आणि ही ओळख कुणी पुसून टाकण्याचेही कारण नाही. सारी आंबेडकरी जनता बाळासाहेबांमध्ये बाबासाहेब शोधायला लागते. अशा वेळी विशेषत: आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने बाळासाहेबांकडून होणारी वक्तव्ये अधिक जबाबदारीची व शान वाढविणारी अपेक्षित असतात. नाउमेद करणारी, पराभूत मानसिकतेची व अवसानघातकी वक्तव्ये त्यांनी करू नयेत, असे निळी टोपी घालणाऱ्या दरएक आंबेडकरी माणसाला वाटते. आता याचा विचार स्वत: अ‍ॅड. बाळासाहेबांनी केला पाहिजे. कुणीतरी मांडणी करायला लावतेय म्हणूनही अशी वक्तव्ये होता कामा नये. स्वत:चा आतला आवाज काय सांगतोय हे अशावेळी अधिक महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. अर्थात बाळासाहेबांना अशी अक्कल शिकवण्याची गरज नाही. ते वर्षानुवर्षे राजकारण करताहेत, रिपब्लिकनच्या अन्य कोणत्याही गटापेक्षा त्यांचे राजकारण एककल्ली वाटत असले तरी खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचे आहे, हे नाकारून चालणार नाही; पण मधूनच खळबळ उडविणारी वक्तव्ये ते करीत असतात. आणि अख्खी आंबेडकरी चळवळ म्हणजे काही सारं राजकारण नाही, ती चळवळ आहे. खऱ्या अर्थाने ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक स्वरूपाची आहे. बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांची मोठी तपश्चर्या या चळवळीमध्ये समाविष्ट आहे, अशी ती संपेल, हरेल, पडेल, झडेल असे वाटत नाही. तिच्यात एक दम आहे, तिच्यात एक ताकद आहे. ती ओळखण्याची गरज आहे.

- स.सो.खंडाळकर