शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बचेंगे तो और भी लडेंगे असं का नाही म्हणत?

By admin | Updated: August 13, 2014 01:44 IST

‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.

‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. भारतासारख्या देशात आता रोजच कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालूच असतात. किंबहुना हा देशच निवडणुकांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, अशा या देशात निवडणुका येतात... जातात, त्यात हार होते वा जीत होते. अशा वेळी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही भाषा शोभून दिसते. तमाम आंबेडकरी चळवळीची शान वाढविण्याऐवजी, कार्यकर्त्यांचा हौसला बुलंद करण्याऐवजी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा जाणता, दिग्गज नेता अशी निराशा पदरी का घेत आहे, हा खरा प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष कोणता, त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय यश मिळवले किंवा वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये या पक्षाची ताकद किती, हा प्रश्नही अलाहिदा; पण बाळासाहेब आंबेडकरांची खरी ओळख आहे, ती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आणि ही ओळख कुणी पुसून टाकण्याचेही कारण नाही. सारी आंबेडकरी जनता बाळासाहेबांमध्ये बाबासाहेब शोधायला लागते. अशा वेळी विशेषत: आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने बाळासाहेबांकडून होणारी वक्तव्ये अधिक जबाबदारीची व शान वाढविणारी अपेक्षित असतात. नाउमेद करणारी, पराभूत मानसिकतेची व अवसानघातकी वक्तव्ये त्यांनी करू नयेत, असे निळी टोपी घालणाऱ्या दरएक आंबेडकरी माणसाला वाटते. आता याचा विचार स्वत: अ‍ॅड. बाळासाहेबांनी केला पाहिजे. कुणीतरी मांडणी करायला लावतेय म्हणूनही अशी वक्तव्ये होता कामा नये. स्वत:चा आतला आवाज काय सांगतोय हे अशावेळी अधिक महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. अर्थात बाळासाहेबांना अशी अक्कल शिकवण्याची गरज नाही. ते वर्षानुवर्षे राजकारण करताहेत, रिपब्लिकनच्या अन्य कोणत्याही गटापेक्षा त्यांचे राजकारण एककल्ली वाटत असले तरी खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचे आहे, हे नाकारून चालणार नाही; पण मधूनच खळबळ उडविणारी वक्तव्ये ते करीत असतात. आणि अख्खी आंबेडकरी चळवळ म्हणजे काही सारं राजकारण नाही, ती चळवळ आहे. खऱ्या अर्थाने ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक स्वरूपाची आहे. बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांची मोठी तपश्चर्या या चळवळीमध्ये समाविष्ट आहे, अशी ती संपेल, हरेल, पडेल, झडेल असे वाटत नाही. तिच्यात एक दम आहे, तिच्यात एक ताकद आहे. ती ओळखण्याची गरज आहे.

- स.सो.खंडाळकर