शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बचेंगे तो और भी लडेंगे असं का नाही म्हणत?

By admin | Updated: August 13, 2014 01:44 IST

‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.

‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. भारतासारख्या देशात आता रोजच कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालूच असतात. किंबहुना हा देशच निवडणुकांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, अशा या देशात निवडणुका येतात... जातात, त्यात हार होते वा जीत होते. अशा वेळी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही भाषा शोभून दिसते. तमाम आंबेडकरी चळवळीची शान वाढविण्याऐवजी, कार्यकर्त्यांचा हौसला बुलंद करण्याऐवजी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा जाणता, दिग्गज नेता अशी निराशा पदरी का घेत आहे, हा खरा प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष कोणता, त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय यश मिळवले किंवा वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये या पक्षाची ताकद किती, हा प्रश्नही अलाहिदा; पण बाळासाहेब आंबेडकरांची खरी ओळख आहे, ती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आणि ही ओळख कुणी पुसून टाकण्याचेही कारण नाही. सारी आंबेडकरी जनता बाळासाहेबांमध्ये बाबासाहेब शोधायला लागते. अशा वेळी विशेषत: आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने बाळासाहेबांकडून होणारी वक्तव्ये अधिक जबाबदारीची व शान वाढविणारी अपेक्षित असतात. नाउमेद करणारी, पराभूत मानसिकतेची व अवसानघातकी वक्तव्ये त्यांनी करू नयेत, असे निळी टोपी घालणाऱ्या दरएक आंबेडकरी माणसाला वाटते. आता याचा विचार स्वत: अ‍ॅड. बाळासाहेबांनी केला पाहिजे. कुणीतरी मांडणी करायला लावतेय म्हणूनही अशी वक्तव्ये होता कामा नये. स्वत:चा आतला आवाज काय सांगतोय हे अशावेळी अधिक महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. अर्थात बाळासाहेबांना अशी अक्कल शिकवण्याची गरज नाही. ते वर्षानुवर्षे राजकारण करताहेत, रिपब्लिकनच्या अन्य कोणत्याही गटापेक्षा त्यांचे राजकारण एककल्ली वाटत असले तरी खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचे आहे, हे नाकारून चालणार नाही; पण मधूनच खळबळ उडविणारी वक्तव्ये ते करीत असतात. आणि अख्खी आंबेडकरी चळवळ म्हणजे काही सारं राजकारण नाही, ती चळवळ आहे. खऱ्या अर्थाने ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक स्वरूपाची आहे. बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांची मोठी तपश्चर्या या चळवळीमध्ये समाविष्ट आहे, अशी ती संपेल, हरेल, पडेल, झडेल असे वाटत नाही. तिच्यात एक दम आहे, तिच्यात एक ताकद आहे. ती ओळखण्याची गरज आहे.

- स.सो.खंडाळकर