शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पथदिव्यांसाठी नव्याने निविदा मागविणार

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला आहे,

औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला आहे, त्यामुळे पालिकेने पथदिव्यांसाठी नव्याने कंत्राट देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.आॅगस्टमध्ये स्थायी समितीच्या बैठकीत ११२ कोटी रुपयांचे पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यासाठी ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रुपये, दोन्ही मिळून ११२ कोटी २१ लाख ६८ हजार रुपयांची ती निविदा होती. बीओटीवरील कामासाठी ९६ महिन्यांचा कालावधी होता. ३ महिन्यांचा प्रीपेटरी कालावधी होता. २ कोटी ७२ लाख रुपये दरमहा कं त्राटदाराला देण्याचा निविदेत उल्लेख होता. या निविदा प्रक्रि येवर कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे शहरातील पथदिव्यांचे काम सुरू झाले नाही. परिणामी पालिकेला आहे त्या कंत्राटदारांकडून पथदिवे लावण्याचे काम हाती घ्यावे लागले. मनपाने सध्या उभारून ठेवलेल्या खांबांचे व इतर साहित्य, पथदिवे काढून काय करणार, असा नगरसेवकांचा प्रश्न होता. त्या साहित्याचा लिलाव होईल, असे प्रशासनाचे मत होते. सध्या काम पाहणाऱ्या विनवॉक या संस्थेनेही मनपाला वीज बचतीच्या नावाखाली फसविल्याचा आरोप होतो आहे. इन्फ्रास्ट्रक्च र बदलणे गरजेचे आहे. गंजलेल्या खांबांवर दिवे लावून उपयोग नाही. ११२ कोटींच्या निविदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; परंतु शहराला अंधारात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पालिका नव्याने निविदा मागविण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ४४० हजार पथदिवे आणि २८ हजारांच्या आसपास खांब मुख्य रस्त्यांवर आहेत. जालना रोडसारखा रस्ता अंधारात आहे. पैशांअभावी सर्व कामे ठप्प आहेत, असे सूत्रांनी सांगितले.