शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनाची वाट कशाला पाहता, थेट सुरू करा विद्युतीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:03 IST

औरंगाबाद : मनमाड ते नांदेडदरम्यानच्या एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाचे भूमिपूजन कोरोनाच्या वाढत्या विळख्यात अडकले आहे. परिणामी, विद्युतीकरणाच्या कामाला मुहूर्तच मिळत ...

औरंगाबाद : मनमाड ते नांदेडदरम्यानच्या एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाचे भूमिपूजन कोरोनाच्या वाढत्या विळख्यात अडकले आहे. परिणामी, विद्युतीकरणाच्या कामाला मुहूर्तच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. मराठवाड्यातील रेल्वेप्रश्न आधीच वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. आता मंजूर झालेले काम भूमिपूजनासाठी रेंगाळले आहे. कोरोनाची अडचण असेल तर भूमिपूजन न करता थेट कामाला सुरुवात करण्याची मागणी रेल्वे संघटनांकडून होत आहे.

मनमाड - नांदेड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचा मार्ग काही दिवसांपूर्वीच मोकळा झाला. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याने काही दिवसांपासून या कामाच्या भूमिपूजनाकडे लक्ष लागले आहे. विद्युतीकरणाच्या भूमिपूजनानिमित्त औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील सोयीसुविधांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. रेल्वेस्टेशनवर आवश्यक ती कामे करण्यात आली. भूमिपूजनाची कोनशिला कुठे बसवायची, याचीही चाचपणी करण्यात आली. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठविण्याचीही रेल्वेने तयार केली, पण फेब्रुवारीत कोरोनाचा विळखा वाढला आणि भूमिपूजनाचा मुहूर्त हुकत असल्याने विद्युतीकरण अजूनही कागदावरच आहे.,

भूमिपूजनाशिवाय काम सुरू करा

मराठवाड्यातील रेल्वेप्रश्न सुटण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. विद्युतीकरणाचे भूमिपूजन जानेवारीत होईल, मग नंतर फेब्रुवारीत होईल सांगितले. मार्च अर्धा संपला. तरीही भूमिपूजन झाले नाही. भूमिपूजन न करताही काम सुरू करता येईल.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

कोरोना वाढल्याने अडचण

भूमिपूजनासाठी रेल्वेमंत्री मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार होते. परंतु, कोरोना वाढल्याने अडचण येत आहे. त्यांच्या मी संपर्कात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते येतील. विद्युतीकरणासह अन्य कामे होण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना औरंगाबादला आणणे गरजेचे आहे. दिल्लीतून आनलाईन पद्धतीने भूमिपूजन अथवा भूमिपूजन न करताही काम सुरू करता येईल. यासंदर्भात रेल्वे बोर्डाशी चर्चा केली जाईल.- खा. डाॅ. भागवत कराड