शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

का होतेय असे? हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही

By संतोष हिरेमठ | Updated: September 10, 2024 17:27 IST

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: वेळीच लक्ष द्या, आत्महत्या रोखणे हे शक्य

छत्रपती संभाजीनगर : मला कमी गुण मिळाले, घरात मला कोणीच मान देत नाही, मला मोबाइल दिला जात नाही, म्हणून स्वत:ला संपविण्याचे हे कारण असू शकते का? आत्महत्येची कारणे शोधली तर अशाच घटना समोर येतात. हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही. तरुण-तरुणींमध्ये व्यसनाधीनता, झटपट यश मिळण्याची अपेक्षा, आदी कारणांनी आत्महत्या होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे म्हणाले, विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये आत्महत्येचे विचार बघायला मिळतात. नैराश्य अधिक प्रमाणात असते. बायपोलार मूड इलनेस, स्किझोफ्रेनिया आजारांची लक्षणे काही रुग्णांमध्ये आढळतात. मादक पदार्थांचे सेवन आणि आत्महत्या प्रवृत्ती एकत्र बघायला मिळते. डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, ‘एनसीआरबी’ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

जिल्ह्यात ५२८ जणांची आत्महत्याग्रामीण भागात २०२३ मध्ये ५२८ जणांनी आत्महत्या केली. यात १४ ते १८ वर्षे वयोगटातील ११ जणांनी, तर १४ वर्षे वयोगटातील तिघांनी आत्महत्या केली.

अपयशातून पुढे जाणे शिकवामुलांना अपयशातून पुढे कसे जावे, हे पालकांनी शिकविले पाहिजे. मुलांची क्षमता ओळखून त्यांच्याकडून अपेक्षा केल्या पाहिजे. आत्महत्येचा प्रयत्न करणारे अगदी १० वर्षांच्या मुलांपासून तरुण, ज्येष्ठ रुग्ण उपचारासाठी येतात.- डॉ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

ही तर इमर्जन्सीआत्महत्येचे विचार येणे, तसा प्रयत्न करणे या गोष्टी मानसोपचारशास्त्रामध्ये इमर्जन्सी मानली जाते. अति नैराश्य तसेच सायकोसिस या आजारात आत्महत्या प्रामुख्याने आढळून येतात.- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ

ही चिंतेची बाबहल्ली १३ ते १४ वर्षांचे मूलही सहज आत्महत्याविषयी बोलून जाते. मला जगायचे नाही. मरावे वाटते, असे ते म्हणते. तिशीच्या आतील आत्महत्येचा विचार येणारी किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ही चिंतेची बाब आहे- डाॅ. संदीप सिसोदे, समुपदेशक

...तर गांभीर्याने घ्यावेनैराश्य आणि मानसिक विकार ही कारणे हे जवळपास ७० टक्के आत्महत्या करणाऱ्यांमागे असतात. कोणी व्यक्ती जर आत्महत्येबाबत बोलत असेल तर ते गांभीर्याने घ्यावे. त्या व्यक्तीच्या संपर्कात राहावे.- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ

सात महिन्यांत ८३ शेतकऱ्यांची आत्महत्याछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते जुलैदरम्यान एकूण ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजपर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले.- डाॅ. जितेंद्र डोंगरे, सहायक संचालक तथा मनोविकृतीशास्त्रज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी