शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

लेकरांसह संपूर्ण कुटूंब संकटात

By admin | Updated: January 11, 2015 00:55 IST

उस्मानाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून रूईभर येथील तरूण शेतकऱ्याने ११ डिसेंबर रोजी आत्महत्या करून स्वत:ला संकटाच्या जोखडातून मुक्त करून घेतले.

उस्मानाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून रूईभर येथील तरूण शेतकऱ्याने ११ डिसेंबर रोजी आत्महत्या करून स्वत:ला संकटाच्या जोखडातून मुक्त करून घेतले. परंतु, त्यांच्या जाण्याने आता वृद्ध आईसोबतच अपंग पत्नी दोन मुली अन् एक मुलगा असे अख्खं कुटुंबचं उघड्यावर आलं आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्यामुळे आता मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकण्याची वेळ अनिता जगताप यांच्यावर येवून ठेपली आहे.रूईभर येथील तरूण शेतकरी बाबासाहेब माणिक जगताप हे जन्मत:च मुकबधीर आणि कर्णबधीरही होते. त्यांना फारशी जमीनही नव्हती. परंतु, आहे त्या सव्वा एकर क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरगाडा हाकित होते. त्यांच्या पत्नी अनिता या एका पायाने अपंग असतानाही तितक्याच हिमतीने त्यांना साथ देत. तसेच वडिलांचाही आधार होता. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने या सव्वा एकरातून सहा जणांचा उदरनिर्वाह होईल, इतकेही उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे बाबासाहेब आणि अनिता हे दोघेही मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकित होते. मध्यंतरी त्यांनी सोसायटीकडून कर्जही घेतले. परंतु, नापिकीमुळे त्याचीही परतफेड करता आली नाही. तसेच मुले जसजशी वरच्या वर्गामध्ये जात होती, तसतसा खर्चही वाढत गेला. यातूनही मार्ग काढत हे दाम्पत्य धिराने संसार करीत होते. असे असतानाच बाबासाहेब यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. या घटनेनंतर मात्र, बाबासाहेब सातत्याने तनावाखाली असायचे. असे असतानाच त्यांनी ११ डिसेंबर २०१४ रोजी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने संकटाच्या जोखडातून कुटुंबाची मुक्तता झाली नाही, तर उलट एका पायाने अपंग असलेल्या अनिता यांच्या खांद्यावर वृद्ध सासूचा सांभाळ करण्यासोबतच स्रेहल, जोत्सना व प्रमोद या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही येवून ठेपली आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या विवाहाचा प्रश्नही आज ना उद्या उभा रहाणार आहे. एकूणच बाबासाहेब यांच्या जाण्याने अख्खं कुटुंबच संकटाच्या गर्तेत सापडले आहे. (प्रतिनिधी)