शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सभापती कोण होणार?

By admin | Updated: September 29, 2014 00:51 IST

औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत.

औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत. त्याची गडद सावली जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवर पडली आहे. दि.१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीतून नेमके कसे चित्र समोर येईल, याविषयी कुणालाही कल्पना करणे अवघड झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची २१ सप्टेंबर रोजी निवड झाली व २५ सप्टेंबर रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला. त्याचे पडसाद सभापतीपदाच्या निवडणुकीवर उमटणे स्वाभाविक आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता होती. या आघाडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यापूर्वीच खेचले आहे; परंतु आता सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची तोंडे परस्पर विरोधी झाली आहेत. युती व आघाडी फुटल्याने झालेल्या भूकंपातून अद्याप राजकीय मंडळी सावरलेली नाही. त्यात विधानसभेसाठी उमेदवाराची निवड, उमेदवारी दाखल करण्याची धावपळ करावी लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड दुय्यम ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी अद्याप कोणत्याही पक्षाने अद्याप काहीही रणनीती ठरविलेली नाही किंवा त्यावर चर्चाही झालेली नाही. फुटाफुटीमुळे गणिते बदलणार६० सदस्यीय जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष शिवसेना (१८ सदस्य) आहे. त्या खालोखाल काँग्रेस (१५), राष्ट्रवादी (११), मनसे (८) व भाजपा (६), असा क्रम आहे; परंतु राजकीय साठमारीमुळे चित्र बदलण्याची शक्यता दिसते आहे. गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच त्यांच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी युतीला पाठिंबा दिला होता. आता त्यांच्या प्रवेशाने भाजपाचे जिल्हा परिषदेतील बल ६ वरून ८ वर पोहोचले आहे. दुसऱ्या बाजूला सभापतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेचे पाच सदस्य सहलीवर गेलेले आहेत. त्यांची भूमिका पक्षाला मदत करण्याची राहील की, काँग्रेसला हे आताच सांगणे अशक्य आहे. जि. प. तील सर्व संबंधितांचे लक्ष आता १ आॅक्टोबरकडे लागले आहे.