शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
3
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
4
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
5
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
6
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
7
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
8
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
12
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
13
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
14
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
15
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
16
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
17
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
18
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
19
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

सभापती कोण होणार?

By admin | Updated: September 29, 2014 00:51 IST

औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत.

औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत. त्याची गडद सावली जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवर पडली आहे. दि.१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीतून नेमके कसे चित्र समोर येईल, याविषयी कुणालाही कल्पना करणे अवघड झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची २१ सप्टेंबर रोजी निवड झाली व २५ सप्टेंबर रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला. त्याचे पडसाद सभापतीपदाच्या निवडणुकीवर उमटणे स्वाभाविक आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता होती. या आघाडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यापूर्वीच खेचले आहे; परंतु आता सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची तोंडे परस्पर विरोधी झाली आहेत. युती व आघाडी फुटल्याने झालेल्या भूकंपातून अद्याप राजकीय मंडळी सावरलेली नाही. त्यात विधानसभेसाठी उमेदवाराची निवड, उमेदवारी दाखल करण्याची धावपळ करावी लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड दुय्यम ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी अद्याप कोणत्याही पक्षाने अद्याप काहीही रणनीती ठरविलेली नाही किंवा त्यावर चर्चाही झालेली नाही. फुटाफुटीमुळे गणिते बदलणार६० सदस्यीय जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष शिवसेना (१८ सदस्य) आहे. त्या खालोखाल काँग्रेस (१५), राष्ट्रवादी (११), मनसे (८) व भाजपा (६), असा क्रम आहे; परंतु राजकीय साठमारीमुळे चित्र बदलण्याची शक्यता दिसते आहे. गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच त्यांच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी युतीला पाठिंबा दिला होता. आता त्यांच्या प्रवेशाने भाजपाचे जिल्हा परिषदेतील बल ६ वरून ८ वर पोहोचले आहे. दुसऱ्या बाजूला सभापतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेचे पाच सदस्य सहलीवर गेलेले आहेत. त्यांची भूमिका पक्षाला मदत करण्याची राहील की, काँग्रेसला हे आताच सांगणे अशक्य आहे. जि. प. तील सर्व संबंधितांचे लक्ष आता १ आॅक्टोबरकडे लागले आहे.