शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नांगर धरण्याची ताकद ज्याच्या मनगटात, त्यालाच अध्यक्ष करू

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

पानगाव : ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले

पानगाव : वातानुकूलित वातावरणात वावरणारा व वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. तर तळागाळातून, सर्वसामान्य माणसांतून पुढे आलेला सामान्य कार्यकर्ता, ज्याला की प्रश्नांची जाण आहे. ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पानगाव येथे झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. मंचावर आमदार विनायकराव पाटील, रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, विजय क्षीरसागर, ओमप्रकाश गोडभरले, ‘पन्नगेश्वर’चे उपाध्यक्ष किशन भंडारे, काशीराम पाटील, राजकुमार मजगे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, भागवत सोट, विजय काळे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, व्यंकट अनामे, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, शालिनी कराड, सुरेश लहाने, भाऊसाहेब हाके-पाटील, नवनाथ भोसले, वसंत दहिफळे, श्रीकिशन जाधव, पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, सुकेशिनी भंडारे, गंगासिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेस देशात व राज्यात सत्तेत होती. त्यांनी काहीच केले नाही. किमान लातूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काँग्रेसला करता आली नाही. त्यामुळेच काँग्रेसला सध्या अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नाहीत. जिल्ह्यात लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा व निलंगा हे काँग्रेसचे बुरुज आहेत. त्यापैकी निलंग्याचा बुरुज मी उखडून फेकला आहे. इतर बुरुजं आपल्याला संपवायचे आहेत. येत्या निवडणुकीत निलंग्यात काँग्रेसचे खातेही उघडू देणार नाही. (वार्ताहर)