शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांगर धरण्याची ताकद ज्याच्या मनगटात, त्यालाच अध्यक्ष करू

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

पानगाव : ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले

पानगाव : वातानुकूलित वातावरणात वावरणारा व वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. तर तळागाळातून, सर्वसामान्य माणसांतून पुढे आलेला सामान्य कार्यकर्ता, ज्याला की प्रश्नांची जाण आहे. ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पानगाव येथे झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. मंचावर आमदार विनायकराव पाटील, रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, विजय क्षीरसागर, ओमप्रकाश गोडभरले, ‘पन्नगेश्वर’चे उपाध्यक्ष किशन भंडारे, काशीराम पाटील, राजकुमार मजगे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, भागवत सोट, विजय काळे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, व्यंकट अनामे, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, शालिनी कराड, सुरेश लहाने, भाऊसाहेब हाके-पाटील, नवनाथ भोसले, वसंत दहिफळे, श्रीकिशन जाधव, पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, सुकेशिनी भंडारे, गंगासिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेस देशात व राज्यात सत्तेत होती. त्यांनी काहीच केले नाही. किमान लातूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काँग्रेसला करता आली नाही. त्यामुळेच काँग्रेसला सध्या अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नाहीत. जिल्ह्यात लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा व निलंगा हे काँग्रेसचे बुरुज आहेत. त्यापैकी निलंग्याचा बुरुज मी उखडून फेकला आहे. इतर बुरुजं आपल्याला संपवायचे आहेत. येत्या निवडणुकीत निलंग्यात काँग्रेसचे खातेही उघडू देणार नाही. (वार्ताहर)