शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नांगर धरण्याची ताकद ज्याच्या मनगटात, त्यालाच अध्यक्ष करू

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

पानगाव : ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले

पानगाव : वातानुकूलित वातावरणात वावरणारा व वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. तर तळागाळातून, सर्वसामान्य माणसांतून पुढे आलेला सामान्य कार्यकर्ता, ज्याला की प्रश्नांची जाण आहे. ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पानगाव येथे झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. मंचावर आमदार विनायकराव पाटील, रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, विजय क्षीरसागर, ओमप्रकाश गोडभरले, ‘पन्नगेश्वर’चे उपाध्यक्ष किशन भंडारे, काशीराम पाटील, राजकुमार मजगे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, भागवत सोट, विजय काळे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, व्यंकट अनामे, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, शालिनी कराड, सुरेश लहाने, भाऊसाहेब हाके-पाटील, नवनाथ भोसले, वसंत दहिफळे, श्रीकिशन जाधव, पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, सुकेशिनी भंडारे, गंगासिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेस देशात व राज्यात सत्तेत होती. त्यांनी काहीच केले नाही. किमान लातूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काँग्रेसला करता आली नाही. त्यामुळेच काँग्रेसला सध्या अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नाहीत. जिल्ह्यात लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा व निलंगा हे काँग्रेसचे बुरुज आहेत. त्यापैकी निलंग्याचा बुरुज मी उखडून फेकला आहे. इतर बुरुजं आपल्याला संपवायचे आहेत. येत्या निवडणुकीत निलंग्यात काँग्रेसचे खातेही उघडू देणार नाही. (वार्ताहर)