शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकऱ्यांनी विकल्यावर पांढऱ्या सोन्याला भाव आला, व्यापाऱ्यांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:05 IST

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला मार बसला. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही शेतकऱ्यांचा कपाशीच्या पिकावर ...

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला मार बसला. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही शेतकऱ्यांचा कपाशीच्या पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. आता ६,२०० रुपये क्विंटलप्रमाणे सुपर कापसाला दर मिळत आहे. त्यामुळे गावोगावी जाऊन व्यापारी कापूस शोधताना दिसत आहेत.

सुरुवातीला कपाशीचा दर पाच हजार रुपये असताना शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला, तर शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून पाच हजार आठशे रुपयांपर्यंत कापूस खरेदी केला. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्राचा फायदा झाला. मात्र, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. शेतकऱ्यांनी शासनाच्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण खासगी व्यापाऱ्यांकडून सहा हजारांच्यावर कापसाला भाव दिला जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडील कापूस संपत आला, तशी कापसाच्या दरात वाढ होत गेली. या कापूस दरवाढीचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला, तर दरवाढीचा खासगी व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

------

मागील वर्षी कोरोनाच्या रोगाच्या संसर्ग वाढू नये. यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनच्या काळातही शासनाने शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदीचा लाभ मिळवून दिला. शेतकऱ्याचा कापूस संपेपर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवली होती. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच सुरू केली होती. - राजू म्हस्के, जिनिंग प्रेसिंग संचालक, वडोद बाजार.