शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

जलसंधारण महामंडळाचा पांढरा हत्ती

By admin | Updated: May 15, 2016 00:05 IST

विकास राऊत, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपालांनी निर्देशित केलेल्या दोन महामंडळांची कार्यालये आहेत. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आणि दुसरे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ.

विकास राऊत, औरंगाबादजिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपालांनी निर्देशित केलेल्या दोन महामंडळांची कार्यालये आहेत. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आणि दुसरे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ. ही दोन्ही कार्यालये पांढरा हत्ती पोसण्यासारखेच आहेत. जलसंधारण महामंडळाची स्थापना औरंगाबाद मध्यवर्ती शहर असल्यामुळे १९९९-२००० साली करण्यात आली. १६ वर्षांपासून १० कर्मचाऱ्यांचा ताफा या कार्यालयाला देण्यात आला.सिंचनाची कामे या महामंडळाकडून व्हावीत, यासाठी संपूर्ण राज्याचे मध्यवर्ती कार्यालये म्हणून स्थापन करण्यात आलेले हे महामंडळ सध्या शासनाच्या धोरणामुळेच वंचित झाले आहे. मुदतवाढ नाही, निधी नाही आणि विशेष म्हणजे त्या कामासाठी, उद्दिष्टासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले. ते जलसंधारणाचे कामही महामंडळाकडे राहिलेले नाही.कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणतेही काम महामंडळाकडे नसून कार्यालयाची अवस्था एखाद्या रद्दी डेपोसारखी झाली आहे. व्यवस्थापकीय संचालक खापरे हे पुण्यात बसतात. त्यांना तिकडच्या कामातून इकडे येण्यास वेळ मिळत नसल्यामुळे त्यांचा कक्ष बंद आहे. उर्वरित कार्यालयात अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे, झेरॉक्सच्या मशीन पडून आहेत. महामंडळाकडे सध्या कोणतेही काम नाही. ५ वर्षांसाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले. २००५ साली ती मुदत संपली. तेव्हापासून आजवर मुदतवाढ मिळाली नाही. वित्त विभागाकडूनही निधीचा तुटपुंजा पुरवठा झाला. १ एप्रिल २०१६ पासून मुदतवाढ मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु त्याचा फायदा यावर्षी होणार नाही. वित्त विभागाकडून महामंडळाच्या कामाचे आॅडिट होते. २५० हेक्टर खालील जलसंधारणाची कामे महामंडळाने करण्याची तरतूद आहे. गोदावरी महामंडळाचे काम सध्या सुरू आहे, पण तिकडेही पुरेसा निधी नाही. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची तीच अवस्था आहे. निधी नसल्यामुळे काम होत नाहीत; परंतु कर्मचाऱ्यांनाच वेतन सुरू आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत काम करण्यासाठी कर्मचारी नाहीत. मग या मंडळांकडे काम नसेल तर कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणीदेखील मध्यंतरी झाली; परंतु शासनाने अजून याकडे काहीही लक्ष दिलेले नाही. वैधानिक महामंडळाच्या इमारतीत जिल्हाधिकारी एखाद्या बैठकीला जातात. परंतु जलसंधारणाच्या इमारतीत तर त्यांनी अजून ढुंकूनही पाहिलेले नाही. शासनाने हे महामंडळ वाळीत टाकल्याची भावना कर्मचाऱ्यांत निर्माण झाली आहे. राज्यपालांकडून मंडळाला निधीचे वाटप होते. दरमहा मंडळाची बैठक होणे अपेक्षित आहे. १० कोटी रुपयांचा खर्चमहामंडळाचे पांढरा हत्तीरूपी कार्यालय पोसण्यासाठी १६ वर्षांत सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, दौरे तसेच इमारत वीज बिल, स्टेशनरी आदींचा समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक, सहसंचालक, उपविभागीय अधिकारी, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी मिळून १० जणांचा स्टाफ महामंडळात आहे.१ कोटी रुपयांचा खर्च दरवर्षी सध्या होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच सगळी वाहने बिनबोभाट उभी असतात. कोण येते, कधी येते. याकडे कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे महामंडळ वाऱ्यावर असल्यासारखे झाले आहे. १६ वर्षांत काय केले... २००० ते २०१६ या १६ वर्षांमध्ये महामंडळाने काय काम केले. किती निधी मिळाला. किती फायदा झाला. याची माहिती देताना सूत्रांनी सांगितले. १४८३ कोटी रुपयांची कामे महामंडळाने केली. १२६७ कामांचा त्यात समावेश आहे. ५८ हजार २८१ हेक्टर जमीन त्यातून सिंचनाखाली आहे. असा दावा महामंडळ सूत्रांकडून करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जलसंधारण महामंडळाचे हे कार्यालय. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अशी वाहन पार्किंग रोज पाहायला मिळते. विचार होणे गरजेचे...जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली कामे जलसंधारण महामंडळाकडे वर्ग करणे गरजेचे होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत ती कामे देण्यात आली आहे. रोहयोकडील यंत्रणेकडे त्या कामांबाबत विशेष असे ज्ञान नाही. त्यामुळे त्यातून चांगले आऊटपूट मिळण्याची शक्यता नाही. जलसंधारण विभागाकडे तांत्रिक यंत्रणा आहे. त्यामुळे याबाबत विचार होणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.