शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल, जिल्हा परिषदेचे आणि तितकेच ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल, जिल्हा परिषदेचे आणि तितकेच पोलीस कर्मचारी निवडणूक शांततेत, शिस्तीत आणि सुरळीत पार पडण्यासाठी राबले. या मेहनतीपोटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे.

कोरोनाचे संकट त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबवून घेतले; परंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ३२ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध, तर ६ ठिकाणी निवडणूकच घेतली गेली नाही. जिल्ह्यातील ३ कोटी २ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात केली असली तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागला. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च झाला. प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसह इतर कामांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. २३ हजार ३५६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी दीड ते दोन कोटींचा निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--

निधीची अडचण

अनुदान आले आहे. ते किती आले आहे, ते अद्याप कळलेले नाही. येत्या एक- दोन दिवसांत जे अनुदान आले ते वाटप करण्यात येईल. पूर्ण अनुदान आलेले नाही. मानधन कुणाला किती द्यायचे ते तहसील पातळीवर ठरविण्यात येते, असे निवडणुकीनंतर सांगण्यात आले होते, तर यासंदर्भात बोलताना तहसीलदार शंकर लाड म्हणाले, अद्याप निधी न आल्याने अनुदान वाटप करण्यात आलेले नाही.

----

जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींची झाली निवडणूक -६१७

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - २००

इतर कर्मचारी किती - २३,१५६

---

तालुकानिहाय आढावा

--

तालुका- ग्रामपंचायती - अधिकारी-कर्मचारी

--

वैजापूर- १०५ -३९००

सिल्लोड- ८३ -३१५४

कन्नड -८३ -३१५४

पैठण -८० -३०४०

औरंगाबाद -७७ -२९२६

गंगापूर -७१ -२६९८

फुलंब्री -५३ -२०१४

सोयगाव -४० -१५२०

खुलताबाद- २५ -९५०