शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल, जिल्हा परिषदेचे आणि तितकेच ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल, जिल्हा परिषदेचे आणि तितकेच पोलीस कर्मचारी निवडणूक शांततेत, शिस्तीत आणि सुरळीत पार पडण्यासाठी राबले. या मेहनतीपोटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे.

कोरोनाचे संकट त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबवून घेतले; परंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ३२ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध, तर ६ ठिकाणी निवडणूकच घेतली गेली नाही. जिल्ह्यातील ३ कोटी २ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात केली असली तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागला. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च झाला. प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसह इतर कामांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. २३ हजार ३५६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी दीड ते दोन कोटींचा निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--

निधीची अडचण

अनुदान आले आहे. ते किती आले आहे, ते अद्याप कळलेले नाही. येत्या एक- दोन दिवसांत जे अनुदान आले ते वाटप करण्यात येईल. पूर्ण अनुदान आलेले नाही. मानधन कुणाला किती द्यायचे ते तहसील पातळीवर ठरविण्यात येते, असे निवडणुकीनंतर सांगण्यात आले होते, तर यासंदर्भात बोलताना तहसीलदार शंकर लाड म्हणाले, अद्याप निधी न आल्याने अनुदान वाटप करण्यात आलेले नाही.

----

जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींची झाली निवडणूक -६१७

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - २००

इतर कर्मचारी किती - २३,१५६

---

तालुकानिहाय आढावा

--

तालुका- ग्रामपंचायती - अधिकारी-कर्मचारी

--

वैजापूर- १०५ -३९००

सिल्लोड- ८३ -३१५४

कन्नड -८३ -३१५४

पैठण -८० -३०४०

औरंगाबाद -७७ -२९२६

गंगापूर -७१ -२६९८

फुलंब्री -५३ -२०१४

सोयगाव -४० -१५२०

खुलताबाद- २५ -९५०