शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांच्या समस्या ‘त्यांना’ काय कळणार?

By admin | Updated: August 17, 2015 01:06 IST

परळी / अंबाजोगाई : ज्यांना शेत काय असते? नांगर काय असतो? याची कसलीही माहिती नाही असे लोक केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने त्यांना शेतकऱ्यांची दु:खे कशी कळणार?

परळी / अंबाजोगाई : ज्यांना शेत काय असते? नांगर काय असतो? याची कसलीही माहिती नाही असे लोक केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने त्यांना शेतकऱ्यांची दु:खे कशी कळणार? असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. ठोस उपाययोजना न आखल्यास १४ सप्टेंबरपासून गावोगावी गुरांसह जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शुक्रवारी पवार परळी, अंबाजोगाईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची सोय, शेतकऱ्यांचे कर्जमाफ, रोजगारांच्या हाताला काम शासनाने उपलब्ध न करुन दिल्यास १४ सप्टेंबर पासून जेलभरो आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले. पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे रस्त्यावर सुद्धा शुकशुकाट दिसून आला. पाण्याची सोय नसल्याने पशुधन कसे जगवाव?े असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आर्थिक दृष्ट्या शेतकरी संकटात आला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्याच्या रस्त्याने जावू नये सरकार जर बघ्याची भूमिका घेत असले तर त्यांना स्वस्थ बसू देणार नाही असे शरद पवार यांनी यावेळी सांगीतले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांनी गारपीटीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत केली आता दुष्काळातही ते शासनाकडून मदत मिळवून देतील अशी आशा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.शनिवारी सकाळी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पवार अंबाजोगाईला गेले. तेथे त्यांनी प्रारंभी डॉ. विमल मुंदडा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, माजीमंत्री सुरेश धस, उषा दराडे, उमेश पाटील, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, संयोजक नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा उपस्थित होते. माणसं जगवायची कशी? अशी भीषण स्थिती मराठवाडयात निर्माण झाली आहे. नव्वद टक्के जलस्त्रोत निकामी झाले. पेरा होऊनही पावसाअभावी हाती काहीच लागणार नाही. जनावरांना चारा नाही, पाणी नाही. मजुरांच्या हातांना काम नाही. यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशी स्थिती असतांनाही ठोस उपाययोजना न आखता पंतप्रधान कृषि खात्याचे नाव बदलून जनतेशी गंमती-जंमती खेळत आहेत. अशी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली. यावेळी डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, डॉ. नरेंद्र काळे, सुदाम पाटील, प्रकाश राऊत, ज्ञानेश्वर चौरे यांच्यासह केज, नेकनूर व अंबाजोगाई तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या व्यथा पवारांसमोर मांडल्या. प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी केले. यावेळी पवारांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. (वार्ताहर)केज तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच सर्जेराव खोडसे यांनी दुष्काळाची व्यथा मांडतांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सर्व आमदार, खासदार, यांचे एक वर्षांचे संपूर्ण मानधन तर सर्व शिक्षकांचा एक महिन्याचा पगार एकत्रित करून या रक्कमेतून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली.४या मागणीला प्रतिउत्तर देताना शरद पवार म्हणाले की, सरपंच, नको तिथे हात घालून विनाकारण भांडण ओढवून घेऊ नका, हे काम इतके सोपे नाही. कर्जमाफी आपण शासनाकडूनच करून घेऊ, असे सांगून त्यांनी खोडसे यांची समजूत काढली.