शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

हरिभाऊ बागडे यांचा पराभव कशामुळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा झालेला पराभव खळबळजनक व आश्चर्यकारक तर आहेच परंतु ...

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा झालेला पराभव खळबळजनक व आश्चर्यकारक तर आहेच परंतु तेवढाच नामुष्कीचाही आहे. हा पराभव नेमका कशामुळे झाला, याची कारणमिमांसा होणेही गरजेचे आहे.

बिगरशेती मतदार संघाच्या ५ जागांसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांच्यासह नितीन पाटील, सतीश चव्हाण, अंबादास दानवे व अभिजीत देशमुख हे उमेदवार होते. या मतदार संघातून प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार जगन्नाथ काळे, अपक्ष अभिषेक जैस्वाल हे निवडून आले. खरंतर हे दोघेच हरिभाऊ बागडे यांना नडले, असे म्हणता येईल. हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे-जगन्नाथ काळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुतच आहे. काळे बंधूंनी बागडे नाना यांच्या पराभवासाठी प्रयत्न केला ही गोष्ट खरीच. परंतु, अभिषेक जैस्वाल हे भाजपचे कार्यकर्ते या निवडणुकीत उगवले आणि त्यांनी विजयही खेचून आणला.

हरिभाऊ बागडे यांनी मतदारांना कसलीही आमिषे वा प्रलोभने दाखवली नाहीत. ते त्यांच्या स्वभावानुसार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी न घेता, दूरध्वनीव्दारे संपर्क करत राहिले. ‘मी ठरवून टाकले होते चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवायची नाही, मतदारांना लक्ष्मी दर्शन होऊ द्यायचे नाही’ असे प्रतिनिधीशी बोलताना हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. तसेच मतपत्रिकेवर बिगरशेती मतदार संघाच्या उमेदवारांमध्ये माझा क्रमांक तेरावा होता. कदाचित त्याचाही फटका बसला असेल. अर्थात जिल्हा बँकेतून जरीे मी मुक्त होत असलो, तरी सहकार क्षेत्रातील माझी सेवा चालूच राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पॅनलमध्ये दामूअण्णा नवपुते यांचे नसणे आणि मंगल वाहेगावकर यांचा समावेश करणे ही रणनीती चुकली का, त्यामुळे बागडे यांच्या मतांवर काही परिणाम झाला का, याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

ऐनवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या निवडणुकीत उडी घेतली व हरिभाऊ बागडे यांना वयानुसार घरी बसण्याचा सल्ला दिला. वय झाले असले तरी हरिभाऊ बागडे कार्यक्षम आहेत. आमदार म्हणून ते फुलंब्री मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतच आहेत. स्वतः स्थापन केलेल्या देवगिरी सहकारी बँक, राजे संभाजी साखर कारखाना, अनेक शैक्षणिक संस्था चालविण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय ते आर्थिक शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये अध्यक्ष या नात्याने त्यांनी आणलेली आर्थिक शिस्त वाखाणण्याजोगी आहे. त्यांची आर्थिक शिस्तही त्यांच्या पराभवाचे कारण असू शकेल, असे राजकीय जाणकार मानतात.

हरिभाऊ बागडे यांचा पराभव एकीकडे आणि बँकेच्या निवडणुकीचा सारा निकाल एकीकडे अशी आजची परिस्थिती आहे. हरिभाऊ बागडे यांच्या पराभवाने अनेक बरे-वाईट संदेश दिले आहेत, एवढे मात्र नक्की.