शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाळा दुरुस्तीचे वय काय? जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल

By admin | Updated: February 3, 2015 01:01 IST

औरंगाबाद : ‘दुरुस्तीसाठी वर्गखोल्यांचे वय काय?’ असा प्रश्न शाळा खोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता

औरंगाबाद : ‘दुरुस्तीसाठी वर्गखोल्यांचे वय काय?’ असा प्रश्न शाळा खोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सवालावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिक्षण समितीच्या सोमवारी (दि. २) झालेल्या बैठकीत करण्यात आला; परंतु वर्गखोल्यांचे निश्चित वयोमान ठरविण्यात समितीला यश आले नसले तरी किमान काळ््या मातीत बांधलेल्या इमारती निर्धारित ५० वर्षाअगोदरच खचल्यामुळे त्या शाळा पाडण्याची परवानगी समितीने मागितली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आली. तीत अनेक विषयांवर चर्चा झाली. विशेषत: कोणत्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, ती किती वर्षांनी करावी आणि वर्गखोल्या दुरुस्तीचे नेमके वय काय असावे यावर बराच खल झाला. सन २०१२ मध्ये वर्गखोल्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. ५ कोटी रुपयांचा निधी असताना तब्बल ९ कोटी रुपयांच्या दुरुस्त्या हाती घेण्यात आल्या होत्या. त्यात अनेक गैरव्यवहार झाले. त्याच त्या शाळा खोल्यांची वारंवार दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. हा अनुभव लक्षात घेता शाळा दुरुस्तीसाठी निधी मागणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी शाळांच्या दुरुस्तीचे वय ठरविण्याचा सल्ला देऊन निरुत्तर केले होते. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या बैठकीतील चर्चा शिक्षण समितीत उपस्थित झाली. सभापती तांबे म्हणाले, नव्या खोल्या बांधल्यानंतर त्यांचे शासकीय आयुर्मान ५० वर्षे असते; परंतु जिल्ह्यात अनेक शाळा काळ््या मातीत बांधलेल्या आहेत. काळ््या मातीतील इमारती लवकर खचतात. त्यामुळे या शाळा लवकर दुरुस्तीला येतात.ही आपली मुख्य अडचण आहे. त्याच मुळे जिल्ह्यातील अनेक शाळा इमारतींना ५० वर्षे पूर्ण झालेली नसली तरी त्या खिळखिळ््या झाल्या आहेत. सतत दुरुस्त्या करूनही त्यांचे आयुष्य वाढविणे अवघड असल्याने अशा शाळा पाडण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. या शाळांचे दुरुस्तीचे व तंदुरुस्तीचे वय शासनाने ठरवू नये. निर्धारित वयोमानापूर्वीच किती शाळा खचल्या व त्या पाडण्याची गरज आहे, अशांची माहिती येत्या आठ दिवसांत जमा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अधिकारी देईनात माहितीसभापती म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर विनोद तांबे यांनी पहिल्याच बैठकीत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळांची माहिती एका विशिष्ट रकान्यात भरून देण्यास सांगितले होते. त्यात शाळा दुरुस्तीची गरज, नवीन वर्गखोल्यांची गरज, किती शाळांना पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, किती शाळांना मुला-मुलींची स्वतंत्र शौचालये आहेत, कपाऊंड वॉल आदी सर्व माहितीचा त्यात समावेश होता. या माहितीनुसारच पुढील दुरुस्ती वेगवेगळी कामे व नवीन वर्गखोल्या देण्याचे धोरण प्राधान्याने ठरविले जाणार होते. मागील तीन बैठकांपासून प्रत्येक बैठकीत या माहितीची मागणी करण्यात आली; परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी अद्यापही माहिती तयार केली नाही, असेही या बैठकीत समोर आले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वारंवार शाळांना भेटी देणे सभापतींनी अनिवार्य केले होते. या भेटीचा विस्तृत अहवालही दर महिन्याच्या शिक्षण समितीच्या बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले होते; परंतु गटविकास अधिकारी मासिक बैठकीत केवळ शाळा भेटीचा आकडा सांगून मोकळे होतात.४ त्यामुळे शाळांची अवस्था नेमकी काय आहे, एखाद्या शाळेने राबविलेला नावीन्यपूर्ण उपक्रम, कोणत्या शाळेत काय प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर उपाय काय करता येतील, या अनुषंगाने काहीही निर्णय घेण्यास या भेटीचा फायदा होत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी येताना शाळा भेटीचे विस्तृत अहवाल तयार करून आणावेत, असे आज पुन्हा एकदा सांगण्यात आले, असे सभापतींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.