शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

विहिरी, तळे आटले; आले डोळ्यांत पाणी!

By admin | Updated: July 28, 2014 00:54 IST

जळकोट : अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, तळे कोरडेठाक पडले आहेत़

जळकोट : अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, तळे कोरडेठाक पडले आहेत़ परिणामी शेतकरी, पशूपालकांच्या डोळ्यांत पाणी उभारले आहे़ दुष्काळी परिस्थितीच्या संकटाचा सामना कसा करायचा? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे़जळकोट तालुका हा डोंगरी माळरानाचा आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेती ही पावसावरच अवलंबून आहे़ गेल्या काही वर्षांत तलावांची संख्या वाढली असली तरी पावसाचे प्रमाण मात्र दरवर्षी कमी झालेले आहे़ परिणामी तालुक्यात पाण्याचा प्रश्न कायम गंभीर राहिला आहे़ यंदाच्या पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना होत आहे़ मृग, आर्द्रा या दोन्ही नक्षत्रांनी हुलकावणी दिली़ त्यानंतरच्या पुनर्वसू नक्षत्रात अल्प पाऊस झाला़ काही शेतकऱ्यांनी घरातील किडूक- मिडूक विकून बी- बियाणे, खते खरेदी केली़ त्यापैकी काही शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली़ परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे उगवलेली पिके वाळून गेली आहेत़ पाऊसच नसल्याने तालुक्यात वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे या परिस्थितीचा सामना कसा करावा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर व पशूपालकांसमोर उभा राहिला आहे़ तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्याने पशूपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी व पशूपालक संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शासनाने मदत द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून होत आहे़(वार्ताहर)संकटावर मात करायची कशी ?पावसाच्या आशेवर होकर्णा व वांजरखेडा शिवारात आम्ही कर्ज काढून मे महिन्यात कापसाची लावण केली आहे़ पावसाने गुंगारा दिल्याने बहरलेले पीक कोमेजून जात आहे़ येत्या पाच- सहा दिवसांत पाऊस झाल्यास नुकसान टळणार आहे़ अन्यथा मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे, अशी भावना माधव भुरे या शेतकऱ्याने व्यक्त केली़ तालुक्यातील ४७ गावांतील परिस्थिती पावसाअभावी भयावह झाली आहे़ पशूधनाच्या चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे पशूपालक तर आकाशाकडे पाहून पावसाची याचना करीत आहेत़