शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच’

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच असून, स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले

औरंगाबाद : आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच असून, स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले. मराठवाड्यावर अन्याय होता कामा नये. मराठवाड्याला न्याय मिळालाच पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, असा आग्रह मात्र त्यांनी धरला. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला; पण मुस्लिम आरक्षण वगळल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा जाहीर निषेधही केला. सरकार जातीयवाद करीत असून हे सारे मतांचे राजकारण असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.आयआयएमला नागपूरला पळवले, जायकवाडीला समन्यायी पद्धतीने पाणी सोडले जात नाही, रेल्वेचे प्रश्न सुटत नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशावेळी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी पुढे येत आहे. आपले मत काय असे विचारता अशोक चव्हाण उत्तरले की, आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच आहोत. मात्र, मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली वगैरे असे काही म्हणता येत नाही. पक्ष सोडून कुणी जात नाही. प्रश्न रेटून न्यावे लागतील. यासाठी पक्षातर्फे बैठका, मेळावे या माध्यमातून जनजागृती सुरूआहे.काँग्रेसचा कार्यक्रम म्हटल्यानंतर नेहमीच नियोजनाचा अभाव बघावयास मिळतो. कोण काय बोलेल, याचा नेम नसतो. आजही सुरेश जेथलिया यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा काढला. विधानसभा निवडणुकांमधील पराभवाचे चिंतन करा.. फार थोड्या मतांनी अनेकजण पडले आहेत, असे उद्गार काढून व दुष्काळाबद्दल फारसे न बोलता ते थांबले. गेव्ह आवारी समिती तक्रारींची छाननी करीत आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी वार्तालाप करताना अब्दुल सत्तार यांचे खटकणारे मध्ये मध्ये बोलणे चालूच होते. देवेंद्र फडणवीस सरकार आता आले. त्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. मग त्यांनी दुष्काळाबद्दल व आयआयएमबद्दल काय केले या प्रश्नाचे उत्तर देताना दोन्ही नेते एकमेकांकडे पाहायला लागले. आयआयएमबद्दल पृथ्वीराज चव्हाण सरकारने निर्णय घेतला होता, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. ४आयआयएमबद्दलचा निर्णय केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घ्यावयाचा आहे. राज्य सरकारच्या शिफारशींची गरज नाही. अजूनही केंद्र सरकार मनात आणेल, तर औरंगाबादला आयआयएम स्थापन करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे चव्हाण यांचे म्हणणे पडले.