शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी

By admin | Updated: May 18, 2017 00:30 IST

मंठा : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तूर, सोयाबीन, ज्वारी, तूर, कापूस यासह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले असले तरी तूर, सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तूर, सोयाबीन, ज्वारी, तूर, कापूस यासह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले असले तरी तूर, सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला तर भाववाढीच्या भरवशावर बसलेल्या कापूस उत्पादकांना आता करावे काय, असा प्रश्न पडला आहे. हंगामात कापूस ५६००-५७०० रुपये प्रतिक्विंटल विकला. ७ हजारापर्यंत भाव जाईल, अशी चर्चा त्यावेळी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विवक्री केला नाही. आता मात्र, फरदड कापसाला ३४०० ते ३८०० तर सुपर कापसाला ५२०० रुपये भाव असल्याने साठवून ठेवलेला कापूस उत्पादकाला आर्थिक फटका बसल्याने हवालदिल झाले आहेत.मंठा तालुक्यात यावर्षी कापसाचे विक्री उत्पादन झाले असले तरीही तीन वर्ष सतत दुष्काळ पडल्याने आणि कापसाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने आर्थिक नड भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बटाव पद्धतीने कमी भावात कापूस विकून टाकला.जिनिंग मालक कापसाच्या रकमेचे धनादेश देत असल्याने एक एक महिना पैशाला विलंब लागला. त्यातही चलन तुटवड्यामुळे शेतकरी हैराणझाले तर भाव वाढून मिळले, या आशेवर अनेक कापूस उत्पादक शेतकरी बसले होते. त्यांच्या घरात ५० ते १०० क्विंटल कापूस आहे. तोही सुपर परंतु भाव गडगडल्याने करायचे काय, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.