शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा चक्क गायब...!

By admin | Updated: September 3, 2014 00:24 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली केली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली केली आहे. आजवर किती नळधारकांनी मनपाची पाणीपट्टी बुडविली, थकविली आहे याचे अधिकृत रेकॉर्ड अद्याप प्रशासनाने तयार केलेले नाही. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मते ६० कोटींची थकबाकी असेल; परंतु करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी मात्र आयुक्तांना त्या प्रकरणी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती रक्कम किती हे अद्याप समोर आलेले नाही.१ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील पाणीपुरवठा आणि देखभालीचे काम सुरू केले आहे. १ लाख १० हजार घरगुती नळांची नोंद मनपा दप्तरी आहे, तर २ हजारांच्या आसपास व्यावसायिक नळधारक शहरात आहेत. नळधारकांच्या यादीत हस्तांतरणानंतर मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करसंकलन विभाग पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा मागील अनेक वर्षांपासून उद्देशामध्ये दाखवीत नाही. पुढे अफाट मागे सपाट अशा पद्धतीने आजवर वसुली करण्यात आली आहे. जीटीएलच्या पावलावरमनपाने जीटीएलच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. महावितरणने जीटीएलकडे वीजपुरवठा, देखभाल-दुरुस्तीचा ठेका दिल्यानंतर बड्या थकबाकीदारांकडील रकमेचे काय केले याचे उत्तर अजूनही मिळत नाही, तसे मनपा आणि एसीडब्ल्यूयूसीएल करारामुळे होऊ नये म्हणजे झाले. पाणीपट्टीतून मिळाले ५ कोटी१ एप्रिल २०१४ ते २१ आॅगस्ट २०१४ पर्यंत पाणीपट्टीतून ५ कोटी १ लाख २१ हजार रुपये मनपाने वसूल केले आहेत. गतवर्षी पाणीपट्टीतून २२ कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. नळधारकांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत २ हजार ७५० रुपयांप्रमाणे ३० कोटी २५ लाख रुपये वसुली होणे गरजेचे होते.१ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी पाणीपट्टी वसुली करणार आहे. ६० कोटींच्या आसपास पाणीपट्टीची थकबाकी असू शकते. मात्र तो आकडा निश्चित नाही. थकबाकी वसूल केल्यास कंपनीला कमिशन देण्यात येणार आहे. ५० टक्के वसुली केली, तर रकमेच्या १५ टक्के कमिशन देण्यात येईल. ५१ ते ७५ टक्के थकीत पाणीपट्टीची वसुली केल्यास २० टक्के आणि ७५ टक्क्यांहून अधिक वसुली केल्यास ३० टक्के कमिशन कंपनीला देण्यात येईल, असे आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले.