शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

दहा गावांना पाणीटंचाईचे चटके

By admin | Updated: June 7, 2014 00:23 IST

लोहारा : तालुक्यातील जवळपास दहा गावांना सध्या टंचाईचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

लोहारा : तालुक्यातील जवळपास दहा गावांना सध्या टंचाईचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. टंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण व कूपनलिकांचे प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु, त्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील वर्षी ४७ पैकी ४० गावांमध्ये १५० पेक्षा अधिक बोअरचे अधिग्रहण करण्यात आले होते. तसेच लोहाऱ्याला ४ व वडगावला (गां) २ टँकरने माकणी येथील निम्न तेरणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यावर्षी टंचाईचे संकट गतवर्षीच्या तुलनेत कमी तीव्र आहे. असे असले तरी सध्या नऊ ते दहा गावे टंचाईने त्रस्त झाली आहेत. टंचाई निवारणार्थ सादर केलेले प्रस्ताव प्रशासनाकडून अद्याप मंजूर झाले नसल्याने या गावच्या प्राण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. विशेष म्हणजे परिसरातील बहुतांश प्रकल्प आटले आहेत. त्यामुळे टंचाईमध्ये अधिक भर पडत असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)चार प्रकल्प कोरडेठाकलघु पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन तलाव लोहारा (खुर्द), कानेगाव, मोघा (खुर्द), हिप्परगा सय्यद, तलाव लोहारा (खुर्द), मोघा (बु), माळेगाव, धानुरी, करवंजी, अचलेर, कास्ती (खुर्द), होळी, उदतपूर, बेंडकाळ, जेवळी, कानेगाव या बारा गावांतील सतरा पैकी जेवळी व कानेगाव या दोन तलावात मृतसाठा आहे. नागराळ, करजगाव, धानुरी, हराळी हे चारही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.‘माळेगावात’ १२.८७ % साठालघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या लोहारा (बु) येथील तलावात २५ टक्के, धानुरी १२ टक्के पाणीसाठा आहे. हिप्परगा (खा) तलावातील पाणीपातळी जोत्याखाली आहे. बेलवाडी ३३.३३ टक्के, जेवळी ११.२५ टक्के, तर अन्य तलाव कोरडेठाक आहेत. भोसगा जोत्याखाली तर माळेगाव येथील तलावात १२.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.