शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

लातूर शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करा

By admin | Updated: April 8, 2016 00:25 IST

लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.

लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. नियोजन सुधारून समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवारी मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रस्तुत मागणीसाठी ‘आप’ने मनपा प्रशासनाला साकडे घातले. शाहू चौकातून सकाळी ११.३० वाजता आम आदमी पार्टीचा मोर्चा निघाला. आंदोलनकर्त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. शाहू चौक, अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, गांधी चौक मार्गे मनपा कार्यालयासमोर मोर्चा धडकला. महापुरुषांना अभिवादन करीत मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेधही आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.लातूर मनपाने पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने हाताळला नाही. त्यामुळे अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या आमदारांनीही पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केले. पाणीटंचाईबरोबर कचऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाणी वाटपात भेदभाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले नागरिक त्रस्त आहेत. घरमालकही त्रस्त आहेत.सध्या घरमालक, घरभाडेकरू, मतदार, विरोधक असा पाणी वाटपात भेदभाव केला जात आहे. तसे न करता समन्यायी पद्धतीने सर्वांनाच पाणी द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)