शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:59 IST

मागील दोन दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक वसाहतीला किमान पिण्यापुरते तरी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी आणि शनिवारी ३६ तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक वसाहतीला किमान पिण्यापुरते तरी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी ज्या वसाहतींना पाणी मिळाले नव्हते त्यांना चक्क मंगळवारी पाणी देण्यात आले. दिवसभरात पाणी आले नसल्याची एकही तक्रार नगरसेवक, नागरिकांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली नाही.दिवाळीत पाणीपुरवठा सुरळीत राहावा या दृष्टीने महापालिकेने ३६ तासांचा शटडाऊन घेतला होता. खंडण काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिन्यांची गळती थांबविण्याचे काम केले. याच काळात फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्यात आला. शहरातील विविध व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीपासून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. मागील तीन दिवसांमध्ये शहरातील १५ लाख नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिका तारेवरची कसरत करीत आहे. ३६ तासांच्या खंडण काळामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सोमवारी आणि मंगळवारी शहरातील बहुतांश वसाहतींना पाणी देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली. सोमवारी रोटेशननुसार अनेक वसाहतींना पाणी देणे मनपाला शक्य झाले नव्हते. मंगळवारी दिवसभर कमी-जास्त प्रमाणात पाणी देण्यात आले. जाधववाडी, सुरेवाडी, मयूरपार्क, नंदनवन कॉलनी आदी वसाहतींना पाणी दिले. पाणीपुरवठ्याचे एक चक्र पूर्ण होईपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येणार नसल्याचे चहल म्हणाले. मंगळवारी एकाही नगरसेवकाने पाणी आले नाही, अशी तक्रार केली नाही, असा दावाही त्यांनी केला.