शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

पाणीपुरवठा विस्कळीतच

By admin | Updated: July 31, 2016 01:10 IST

जालना : अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग पावडर नसल्याने चार दिवसांपासून जालना शहराचा पाणीपुरवठा बंद होता.

जालना : अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग पावडर नसल्याने चार दिवसांपासून जालना शहराचा पाणीपुरवठा बंद होता. दरम्यान, शनिवारी सकाळी मुंबईहून परतलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित एजन्सीला आदेश देताच ब्लिचिंग पावडर उपलब्ध झाले आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला. मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे पाणीपुरवठा दररोज होईल, असे चित्र निर्माण झाले असले तरी पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आठ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागली. नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. घाणेवाडी जलाशयात साठा नसल्याने जायकवाडीच्या जलवाहिनीवरुन दोन्ही भागांना पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी १३ जलकुंभ उभारले आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरची गरज असते. गत आठवड्यात पालिकेचे पाणी पुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तोपर्यंत ब्लिचिंग उपबल्ध होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर काही कामानिमित्त मुख्याधिकारी संतोष खांडेकर मुंबईला गेले. दरम्यान, अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग संपले. मात्र, संबंधित सखाराम इंटरप्रायजेस या कंत्राटदार एजन्सीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. शनिवारी सकाळी मुख्याधिकारी खांडेकर हे जालन्यात परतले. त्यांना याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यांनी तात्काळ संबंधित एजन्सीला फोन करुन ब्लिचिंग उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. पालिकेचे अभियंता अशोक दासवाड म्हणाले, २०० बॅग जिप्सम आले आहे. पाण्यात जिप्सम मिसळून नवीन जालना भागात शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जुना जालन्यातही पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)