शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जलवाहिनीची दुरुस्ती रखडली

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जालना : जायकवाडी-जालना जलवाहिनी गुरूवारी सकाळी पैठणजवळ फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. कंत्राटदार आणि पालिकेतील देयकच्या वादावरून दुरुस्ती रखडली आहे.

जालना : जायकवाडी-जालना जलवाहिनी गुरूवारी सकाळी पैठणजवळ फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. कंत्राटदार आणि पालिकेतील देयकच्या वादावरून दुरुस्ती रखडली आहे. परिणामी जालना शहरात जयकवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. जलवाहिनी दुरूस्ती व देखभाल करणाऱ्या एजन्सीचे पालिकेकडे अडीच कोटी रुपये थकित आहेत. जलवाहिनी फुटून तिची दुरूस्ती युद्ध पातळीवर होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात संबंधित एजन्सीने दुरूस्ती न करण्याचा पवित्रा घेतल्याने पाणीपुरवठा बंद आहे. जोपर्यंत दुरूस्ती होत नाही तोपर्यंत शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. काही भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जालना ते जायकवाडी या बहुचर्चित जलवाहिनीतून तीन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा सुरू झाला. पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने सुरूवातीला तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र एजन्सीकडे दुरूस्ती व देखभालीचे काम दिले होते.त्यानंतर हा करार वाढविण्यात आला. संबंधित एजन्सीला पालिकेकडून नियमित देयके अदा करण्यात आली नाहीत. आज रोजी पालिकेकडे तब्बल अडीच कोटी रूपये थकले आहेत. मोठी रक्कम थकल्याने काही दिवसांपासून दुरूस्तीचे काम थांबविले आहे. संबंधित एजन्सीचे तंत्रज्ञ मिळून दहा कर्मचारी आहेत. यात इलेक्ट्रीशिअन, फिटर, वेल्डर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारीच पाणी सोडणे, पंप तसेच इतर दुरूस्तीचे काम करतात. पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे म्हणाले, संबंधित एजन्सीने काम थांबविले आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी अंबड पालिकेकडे थकलेल्या ९० लाख रूपयांच्या रकमेबाबत जिल्हाधिकारी ए. एस. आर. रंगानायक यांच्याशी चर्चा केली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून ही रक्कम वळती करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अंबड पालिकेने शनिवारी दुपारी ५० लाख रुपये जमा केले आहेत. दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे संबंधित एजन्सीसोबत चर्चा करीत आहेत. लवकरच याबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल.