शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

जलवाहिनीची दुरुस्ती रखडली

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जालना : जायकवाडी-जालना जलवाहिनी गुरूवारी सकाळी पैठणजवळ फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. कंत्राटदार आणि पालिकेतील देयकच्या वादावरून दुरुस्ती रखडली आहे.

जालना : जायकवाडी-जालना जलवाहिनी गुरूवारी सकाळी पैठणजवळ फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. कंत्राटदार आणि पालिकेतील देयकच्या वादावरून दुरुस्ती रखडली आहे. परिणामी जालना शहरात जयकवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. जलवाहिनी दुरूस्ती व देखभाल करणाऱ्या एजन्सीचे पालिकेकडे अडीच कोटी रुपये थकित आहेत. जलवाहिनी फुटून तिची दुरूस्ती युद्ध पातळीवर होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात संबंधित एजन्सीने दुरूस्ती न करण्याचा पवित्रा घेतल्याने पाणीपुरवठा बंद आहे. जोपर्यंत दुरूस्ती होत नाही तोपर्यंत शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. काही भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जालना ते जायकवाडी या बहुचर्चित जलवाहिनीतून तीन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा सुरू झाला. पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने सुरूवातीला तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र एजन्सीकडे दुरूस्ती व देखभालीचे काम दिले होते.त्यानंतर हा करार वाढविण्यात आला. संबंधित एजन्सीला पालिकेकडून नियमित देयके अदा करण्यात आली नाहीत. आज रोजी पालिकेकडे तब्बल अडीच कोटी रूपये थकले आहेत. मोठी रक्कम थकल्याने काही दिवसांपासून दुरूस्तीचे काम थांबविले आहे. संबंधित एजन्सीचे तंत्रज्ञ मिळून दहा कर्मचारी आहेत. यात इलेक्ट्रीशिअन, फिटर, वेल्डर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारीच पाणी सोडणे, पंप तसेच इतर दुरूस्तीचे काम करतात. पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे म्हणाले, संबंधित एजन्सीने काम थांबविले आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी अंबड पालिकेकडे थकलेल्या ९० लाख रूपयांच्या रकमेबाबत जिल्हाधिकारी ए. एस. आर. रंगानायक यांच्याशी चर्चा केली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून ही रक्कम वळती करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अंबड पालिकेने शनिवारी दुपारी ५० लाख रुपये जमा केले आहेत. दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे संबंधित एजन्सीसोबत चर्चा करीत आहेत. लवकरच याबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल.