शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने

By admin | Updated: June 15, 2014 00:55 IST

औरंगाबाद : महापालिका रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने करीत असल्याचे स्पष्टीकरण मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

औरंगाबाद : महापालिका रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने करीत असल्याचे स्पष्टीकरण मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ३० वॉर्डांतील सुमारे ५० हजार नागरिक टँकरचे पाणी पीत आहे. टँकरचे पाणी खरंच नागरिकांना मिळते की दुसरीकडे कुठे मुरते हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. सध्या सहा प्रभागांमध्ये ५८ टँकरने पाणीपुरवठा होत असून त्याच्या ५०० फेऱ्या होत आहेत.एक टँकर ८ फेऱ्या मारीत असल्याचे यांत्रिकी विभागाने कळविले आहे. यामध्ये ५ हजार लिटरचे ४७ टँकर आहेत, तर ११ टँकर १० हजार लिटरचे आहेत. मनपा सध्या ५८ टँकरने पाणीपुरवठा करीत असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ यांनी सांगितले. मनपा ३० वॉर्डांत टँकरने पाणीपुरवठा करीत आहे, तर मग १०० हून अधिक समाजसेवकांचे टँकर कोणत्या वसाहतीत जातात, किती नागरिकांना ते पाणीपुरवठा करतात याचा हिशेब लागत नाही. समाजसेवकांच्या मोफत जलसेवांचे टँकर जर याच वसाहतींमध्ये जात असतील, तर मनपाही त्याच वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करते का, असा सवाल आहे.दरवर्षी खाजगी टँकर, डिझेलवर पालिका दीड कोटी रुपये खर्च करते. या वसाहती टँकरवरप्रभाग ‘अ’ व ‘ड’मधील पडेगाव, मिटमिटा, पेठेनगर, खुशबू कॉलनी, पहाडसिंगपुरा, हर्सूल, हिमायतबाग भागांत टँकरने पाणीपुरवठा होतो. प्रभाग ‘ब’ व ‘क’मधील मिसारवाडी, जाधववाडी, म्हसोबानगर, भगतसिंगनगर, केशरदीप, छत्रपतीनगर, माऊलीनगरमध्ये, तर प्रभाग ‘ई’ व ‘फ’मधील जयभवानीनगर, गुरुदत्तनगर, रामनगर, रेणुकानगर, आनंदनगर, अबरार कॉलनी, महूनगर, गणेशनगर, हनुमाननगर, संतोषीमातानगर, गारखेडा परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो, असे मनपाने स्पष्ट केले. या भागात मोफत जलसेवेचे टँकर येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.५० हजार नागरिकांना टँकरचे पाणीसुमारे ५० हजार नागरिकांना मनपा टँकरने पाणीपुरवठा करीत असल्याचे ५८ टँकरच्या फेऱ्यांवरून दिसते. मात्र, तेवढ्या नागरिकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचत नसून काही फेऱ्या कागदोपत्रीच दाखविल्या जात असल्याचा आरोप पालिकेवर होत आहे. दुसरीकडे टँकरच्या मागणीसाठी नागरिक पालिकेला रोज निवेदन देत आहेत.फेऱ्यांचे चक्र असे...५ हजार लिटरचे टँकर ४७ आहेत. त्यात मनपाचे ४ तर ४३ खाजगी टँकर आहेत. त्याच्या अंदाजे ४३० फेऱ्या होतात. त्यातून २२ लाख ४० हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. १० हजार लिटरचे मनपाचे ७, खाजगी ४, असे ११ टँकर आहेत. त्यांच्या ८८ फेऱ्या होतात. ९ लाख लिटर पाणी त्या टँकरमधून पुरविले जाते. एकूण ३१ लाख २० हजार लिटर पाणी टँकरने दिले जाते. प्रभागमनपाचे टँकरखाजगी टँकर एकूणअ व ड ०४१०१४ब व क०४०९१३ई व फ०३२८३१एकूण११४७५८