शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

पाणीस्थिती अद्यापही गंभीर!

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़

औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ तीन महिन्यांत केवळ २९८ मि़मी़ इतकाच पाऊस झाला असून आता पावसाळा संपत आला आहे़ परंतु, अद्यापही तालुक्यातील पाण्याची स्थिती गंभीर आहे़ त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे़ खरीप हंगामातील पेरण्यासाठी औसा तालुक्यात यावर्षी वेळेवर पाऊस झाला नाही़ तसेच जो झाला तोही पाऊस तालुक्यात समान नाही़ तब्बल महिनाभर उशिराने पाऊस झाल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या़ तालुक्यात ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़ यात ६० हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ यामधील ४० ते ५० शेतकऱ्यांना सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या़ तालुक्यात पावसाची स्थिती तशी नाजूकच राहिली आहे़ मागील काही वर्षांपासून सतत कमी होत असलेला पाऊस यावर्षी तर अधिकच कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीरच आहे़ पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत़ सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी- तांड्यावर अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू आहे़ आतापर्यंत सप्टेंबरमध्ये अधिग्रहण करण्याची वेळ आली नव्हती़ ती यावर्षी आली आहे़ रिमझिम पावसाने बहुतांश पिकावर रोग पडले आहेत़(वार्ताहर)तालुक्यात यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत मागील तीन महिन्यात केवळ २९८़४१ मि़मी़ इतकाच पाऊस झाला आहे़ यामध्ये सर्वाधिक पाऊस औसा मंडळात झाला आहे़ सर्वात कमी पाऊस किनीथोट मंडळात झाला आहे़ महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस असा- औसा ३७१ मिमी, लामजना २९४ मिमी, मातोळा २३४, किल्लारी ३४८, भादा २९१, बेलकुंड २६० तर किनीथोट १९१ मिमी इतका पाऊस झाला आहे़ तालुक्याची वार्षिक सरासरी ७८१ मि़मी़ इतकी आहे़ पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले़ पण पावसाने मात्र अजूनही वार्षिक सरासरीची पन्नाशी गाठलेली नाही़ त्यामुळे धरणे, नद्या, नाले, विहिरी, बोअर अजूनही कोरडे आहेत़ आगामी काळात जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर यावर्षी दिवाळीनंतर लगेचच पाणीटंचाई सुरु होणार आहे़कमी पावसामुळे सध्या सबंध तालुक्यातील पाणी साठ्यांची स्थिती चिंताजनक आहे़ मोठा पाऊस झाला तरच विहिरी, तलाव भरतील आणि पाण्याचा प्रश्न सुकर होईल, असे तहसीलदार दत्ता भारस्कर व गटविकास अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले़