शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

पाणीस्थिती अद्यापही गंभीर!

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़

औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ तीन महिन्यांत केवळ २९८ मि़मी़ इतकाच पाऊस झाला असून आता पावसाळा संपत आला आहे़ परंतु, अद्यापही तालुक्यातील पाण्याची स्थिती गंभीर आहे़ त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे़ खरीप हंगामातील पेरण्यासाठी औसा तालुक्यात यावर्षी वेळेवर पाऊस झाला नाही़ तसेच जो झाला तोही पाऊस तालुक्यात समान नाही़ तब्बल महिनाभर उशिराने पाऊस झाल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या़ तालुक्यात ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़ यात ६० हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ यामधील ४० ते ५० शेतकऱ्यांना सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या़ तालुक्यात पावसाची स्थिती तशी नाजूकच राहिली आहे़ मागील काही वर्षांपासून सतत कमी होत असलेला पाऊस यावर्षी तर अधिकच कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीरच आहे़ पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत़ सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी- तांड्यावर अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू आहे़ आतापर्यंत सप्टेंबरमध्ये अधिग्रहण करण्याची वेळ आली नव्हती़ ती यावर्षी आली आहे़ रिमझिम पावसाने बहुतांश पिकावर रोग पडले आहेत़(वार्ताहर)तालुक्यात यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत मागील तीन महिन्यात केवळ २९८़४१ मि़मी़ इतकाच पाऊस झाला आहे़ यामध्ये सर्वाधिक पाऊस औसा मंडळात झाला आहे़ सर्वात कमी पाऊस किनीथोट मंडळात झाला आहे़ महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस असा- औसा ३७१ मिमी, लामजना २९४ मिमी, मातोळा २३४, किल्लारी ३४८, भादा २९१, बेलकुंड २६० तर किनीथोट १९१ मिमी इतका पाऊस झाला आहे़ तालुक्याची वार्षिक सरासरी ७८१ मि़मी़ इतकी आहे़ पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले़ पण पावसाने मात्र अजूनही वार्षिक सरासरीची पन्नाशी गाठलेली नाही़ त्यामुळे धरणे, नद्या, नाले, विहिरी, बोअर अजूनही कोरडे आहेत़ आगामी काळात जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर यावर्षी दिवाळीनंतर लगेचच पाणीटंचाई सुरु होणार आहे़कमी पावसामुळे सध्या सबंध तालुक्यातील पाणी साठ्यांची स्थिती चिंताजनक आहे़ मोठा पाऊस झाला तरच विहिरी, तलाव भरतील आणि पाण्याचा प्रश्न सुकर होईल, असे तहसीलदार दत्ता भारस्कर व गटविकास अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले़