शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे.

दिनेश गुळवे , बीडगेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. उन्हाळ्यात धो-धो कोसळलेल्या पाऊसाने आता पावसाळ्यात दडी मारल्याने तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना टॅँकरने पाणीपुरठा केला जात आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात कधीनव्हे ती जिल्ह्यात प्रचंड गारपीट झाली. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने धरणाची पातळीही प्रथमत:च वाढली होती. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून आलेला पाऊस आता मात्र जून महिना संपला तरी जिल्हावासीयांवर रुसलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३ लाख २७ हजार ५३९ नागरिकांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी शासकीय १९ व खाजगी १६५ टॅँकरचा वापर केला जात आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ आष्टी तालुक्याला सोसावी लागत आहे. या तालुक्यातील १ लाख ७७ नागरिकांसाठी दररोज टॅँकरच्या २२० खेपा केल्या जात आहेत. यासह गेवराई, बीड, शिरूर, पाटोदा, केज व धारूर तालुक्यातही काही ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरसह १८० गावे व १७१ वाड्यांसाठी १३८ विहिरी व २९० बोअरचे अधिग्रहण केले आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी विकत मिळणेही दुरापस्त झाले आहे. यातच जून संपला तरीही पावसाने पाठ फिरविल्याने अनेकांनी स्थलांतर केले आहे. तर, पाऊस पडला नसल्याने प्रशासनही गंभीर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांमध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. गतवर्षी १ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शंभरपेक्षा अधिक मि. मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र अद्याप एकाही तालुक्यात पावसाची सरासरी ४५ चा आकडाही ओलांडू शकली नाही. गेल्या दोन दिवसांपासून काहीसे वातावरण बदललेले आहे. सायंकाळी वातावरण ढगाळ असते, मात्र पाऊस दररोज हुलकावणी देत आहे. त्यामुळे ही दुष्काळाची तर चिन्ह नाहीत ना? याची चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.सर्वांना मुबलक पाणीपुरवठा करूजिल्ह्यात अद्यापही पाऊस नसला पडल्याने अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, पाणीटंचाईच्या कालावधीत वाढ करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनीही पाणीपुरवठ्यासाठी काही नवीन योजना असतील तर सूचवाव्यात. तसेच ज्या योजनांचे काम राहिलेले आहे, तेही पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. एकंदरच उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन केले आहे.नागरिकांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापुढेही ग्रामीण भागात मुबलक पाणी पुरवठा केला जाईल, मागणी आहे तेथे टॅँकर सुरू केले जात असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. (भाग -१ )तालुका टॅँकरने १ जून २०१४ १ जून २०१३पाणीपुरवठा पर्यंत पाऊस पर्यंत पाऊस(लोकसंख्या) बीड ७५९९३ ३४.० १४३.८गेवराई २१९८६ २७.३ १३६.६वडवणी ०० ३६.५ २०८.०शिरूर २६२०० २८.० ११०.१पाटोदा १४३११ ४२.३ १७४.२आष्टी १०००७७ ३४.१ ९३.१अंबाजोगाई ०० ५२.० १२६.१केज ७५७४८ १३.० १२२.०परळी १५०० ४४.८ १२६.८धारूर ११७२४ १०.६ १०४.९माजलगाव ०० ३१.० १२५.१