शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे.

दिनेश गुळवे , बीडगेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. उन्हाळ्यात धो-धो कोसळलेल्या पाऊसाने आता पावसाळ्यात दडी मारल्याने तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना टॅँकरने पाणीपुरठा केला जात आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात कधीनव्हे ती जिल्ह्यात प्रचंड गारपीट झाली. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने धरणाची पातळीही प्रथमत:च वाढली होती. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून आलेला पाऊस आता मात्र जून महिना संपला तरी जिल्हावासीयांवर रुसलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३ लाख २७ हजार ५३९ नागरिकांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी शासकीय १९ व खाजगी १६५ टॅँकरचा वापर केला जात आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ आष्टी तालुक्याला सोसावी लागत आहे. या तालुक्यातील १ लाख ७७ नागरिकांसाठी दररोज टॅँकरच्या २२० खेपा केल्या जात आहेत. यासह गेवराई, बीड, शिरूर, पाटोदा, केज व धारूर तालुक्यातही काही ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरसह १८० गावे व १७१ वाड्यांसाठी १३८ विहिरी व २९० बोअरचे अधिग्रहण केले आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी विकत मिळणेही दुरापस्त झाले आहे. यातच जून संपला तरीही पावसाने पाठ फिरविल्याने अनेकांनी स्थलांतर केले आहे. तर, पाऊस पडला नसल्याने प्रशासनही गंभीर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांमध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. गतवर्षी १ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शंभरपेक्षा अधिक मि. मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र अद्याप एकाही तालुक्यात पावसाची सरासरी ४५ चा आकडाही ओलांडू शकली नाही. गेल्या दोन दिवसांपासून काहीसे वातावरण बदललेले आहे. सायंकाळी वातावरण ढगाळ असते, मात्र पाऊस दररोज हुलकावणी देत आहे. त्यामुळे ही दुष्काळाची तर चिन्ह नाहीत ना? याची चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.सर्वांना मुबलक पाणीपुरवठा करूजिल्ह्यात अद्यापही पाऊस नसला पडल्याने अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, पाणीटंचाईच्या कालावधीत वाढ करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनीही पाणीपुरवठ्यासाठी काही नवीन योजना असतील तर सूचवाव्यात. तसेच ज्या योजनांचे काम राहिलेले आहे, तेही पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. एकंदरच उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन केले आहे.नागरिकांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापुढेही ग्रामीण भागात मुबलक पाणी पुरवठा केला जाईल, मागणी आहे तेथे टॅँकर सुरू केले जात असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. (भाग -१ )तालुका टॅँकरने १ जून २०१४ १ जून २०१३पाणीपुरवठा पर्यंत पाऊस पर्यंत पाऊस(लोकसंख्या) बीड ७५९९३ ३४.० १४३.८गेवराई २१९८६ २७.३ १३६.६वडवणी ०० ३६.५ २०८.०शिरूर २६२०० २८.० ११०.१पाटोदा १४३११ ४२.३ १७४.२आष्टी १०००७७ ३४.१ ९३.१अंबाजोगाई ०० ५२.० १२६.१केज ७५७४८ १३.० १२२.०परळी १५०० ४४.८ १२६.८धारूर ११७२४ १०.६ १०४.९माजलगाव ०० ३१.० १२५.१