शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: November 14, 2015 00:49 IST

जालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील काही गावे व वाड्या तसेच तांड्यांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

जालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील काही गावे व वाड्या तसेच तांड्यांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही प्रकल्प सोडता बहुतांश प्रकल्पांत जेमतेम जलसाठा असल्याने आगामी काळात नियोजन न केल्यास तीव्र पाणीटंचाई होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही गावांमध्ये स्थानिक पातळीवर नियोजन कोलमडत असल्याने ग्रामस्थांना आठ ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. जिल्ह्यात गत काही वर्षांपासून पावसाची सरासरी घटत असल्याने प्रकल्पांत पाणीसाठा नाही. भोकरदन तालुक्यातील जुई, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांची पाणी पातळी आज रोजी मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक गावांत पाणीटंचाई असली तरी टँकर अथवा विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव, मांदळा, येवला, सिद्धेश्वपर पिंपळगाव येथे लघू प्रकल्प आहे. तर मंगरूळ, राजाटाकळी व जोगलादेवी येथे उच्च क्षमतेचे केटिवेअर आहेत. तालुक्यातील तीस ते चाळीस गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सर्वच प्रकल्पांतील पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आगामी दिवसांत तालुक्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे.केटिवेअर मधील पाणी उपशावर बंदी असून, या बंधाऱ्यात ८० टक्के पाणीसाठा आहे.जाफराबाद तालुक्यातील काही गावांसोबतच जाफराबादेत आठ ते पंधरा दिवसाआड पाणी येत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर कोणतेच नियोजन नसल्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. जाफराबाद शहरास खडकपूर्णा मध्यम प्रकल्पांतून पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतींची विहीर पण आहे. अंतर्गत जलवाहिनी जुनाट झाल्याने गावात वारंवार पाणीटंचाई भेडसावते. आजरोजी गावकऱ्यांना आठ ते पंधरा दिवसाआड पाणी मिळते. गावअंतर्गत जलवाहिनी ठिक ठिकाणी फुटलेली आहे. यातून शेकडो लिटर पाणी वाहून जाते.भारज व चिंचखेडा येथील प्रकल्पांत अत्यल्प पाणी आहे.परतूर तालुक्यातील निम्नदुधना, नागतास व कसुरा प्रकल्पांत पन्नास टक्के पाणी आहे. इतर प्रकल्पांत जोत्याच्या खाली पाणी पातळी आहे. सद्यस्थितीत तीस पेक्षा अधिक गावात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनत आहे. टँकरची मागणी नसली तरी डिसेंबर महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची चिंता आहे. मंठा तालुक्यात काही गावात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.बदनापूर तालुक्यातील सोमठाणा प्रकल्प यंदा शंभर टक्के भरल्याने काही गावात पाणीटंचाई नाही. इतर गावांत पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सोमठाणा प्रकल्प सोडता इतर प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहेत. (प्रतिनिधी)भोकरदन तालुक्यातील वडशेद गावाचा विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आला असून, चांदई एक्को व बाणेगावातील प्रकल्पात पाणी कमी आहे. जुई, धामणा प्रकल्पांत चांगले पाणी आहे. डिसेंबरअखेर तालुक्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी, मार्डी, रोहिलागड, गल्हाटी, काटखेडा, डावरगाव, खडकेश्वर, सुखापुरी हे प्रकल्प आहेत. यातील गल्हाटी, सुखापुरी, खडकेश्वर व डावरगाव प्रकल्पात २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २० पेक्षा अधिक गावात पाणीटंचाई आहे. अंबड शहराला डावरगाव व जायकवाडी योजनेतून पाणीपुरवठा होतो. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प वगळता इतर प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याच्या खालीच आहे. टँकर अथवा विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.