शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत.

गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत. गेवराई शहराला खामगाव परिसरातील गोदावरी नदीवरील शहागड बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या शहरात चार ते पाच दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येतो. हे पाणीही मुबलक मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेवराई शहरातील ४५ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा होत असला तरी गेल्या काही दिवसात मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे काही नागरिकांसह हॉटेलसह इतर व्यावसायीकांना पाणी विकत घ्यावे लागते. यावर मोठा खर्च होत असल्याचेही नागरिक सांगतात. अशातच शहागड येथील बंधाऱ्यातही अवघे आठ ते दहा दिवस पुरेल येवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे गेवराई शहरातील नागरिकांवर निर्जळीची वेळ येऊ नये, यासाठी पाण्याचे नियोजन व बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी अक्षय पवार, डॉ. शेख इब्राहिम, राजेंद्र मोटे, मुकुंद बाबर यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष माया सौंदरमल म्हणाल्या, बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. तर, पालीकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे म्हणाले की, गेवराई शहरात सर्वांना मुबलक पाणी मिळेल याचे नियोजन केले आहे. बंधाऱ्यात पाणी सोडण्याची एक पाळी राहिली असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)