शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत.

गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत. गेवराई शहराला खामगाव परिसरातील गोदावरी नदीवरील शहागड बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या शहरात चार ते पाच दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येतो. हे पाणीही मुबलक मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेवराई शहरातील ४५ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा होत असला तरी गेल्या काही दिवसात मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे काही नागरिकांसह हॉटेलसह इतर व्यावसायीकांना पाणी विकत घ्यावे लागते. यावर मोठा खर्च होत असल्याचेही नागरिक सांगतात. अशातच शहागड येथील बंधाऱ्यातही अवघे आठ ते दहा दिवस पुरेल येवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे गेवराई शहरातील नागरिकांवर निर्जळीची वेळ येऊ नये, यासाठी पाण्याचे नियोजन व बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी अक्षय पवार, डॉ. शेख इब्राहिम, राजेंद्र मोटे, मुकुंद बाबर यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष माया सौंदरमल म्हणाल्या, बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. तर, पालीकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे म्हणाले की, गेवराई शहरात सर्वांना मुबलक पाणी मिळेल याचे नियोजन केले आहे. बंधाऱ्यात पाणी सोडण्याची एक पाळी राहिली असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)