शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

दुधना धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:54 IST

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तीन तालुक्यांमधील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन व आ.राहुल पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पिके धोक्यात असून या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी निम्न दुधना प्रकल्पात उपलब्ध असलेले पाणी कालव्याद्वारे सोडावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. आ.डॉ.राहुल पाटील, आ.विजय भांबळे यांनी हा प्रश्न उचलून धरला. आ.डॉ.राहुल पाटील यांनी बुधवारी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. बुधवारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत परभणी जिल्ह्यातील शेतकºयांची अडचण मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आली. झरी, साडेगाव, वाडी दमई, सावंगी, संबर, मटकºहाळा, धार, धर्मापुरी, टाकळी, मांडवा, नांदापूर, खानापूर, जलालपूर आदी गावांमधील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन निम्न दुधनाचे पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर जलसंपदामंत्र्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानुसार गुरुवारी सायंकाळी ५.१० वाजेच्या सुमारास निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाणी सोडण्यात आले. दरम्यान, पावसाचा ताण पडल्याने परिस्थिती गंभीर आहे. धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून शेतकºयांनी सोडलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा. परंतु, अपव्यय करु नये, असे आवाहन माजलगाव कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी केले आहे. दहा दिवस कालव्यांना पाणी राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.