शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दुधना धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:54 IST

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तीन तालुक्यांमधील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन व आ.राहुल पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पिके धोक्यात असून या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी निम्न दुधना प्रकल्पात उपलब्ध असलेले पाणी कालव्याद्वारे सोडावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. आ.डॉ.राहुल पाटील, आ.विजय भांबळे यांनी हा प्रश्न उचलून धरला. आ.डॉ.राहुल पाटील यांनी बुधवारी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. बुधवारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत परभणी जिल्ह्यातील शेतकºयांची अडचण मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आली. झरी, साडेगाव, वाडी दमई, सावंगी, संबर, मटकºहाळा, धार, धर्मापुरी, टाकळी, मांडवा, नांदापूर, खानापूर, जलालपूर आदी गावांमधील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन निम्न दुधनाचे पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर जलसंपदामंत्र्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानुसार गुरुवारी सायंकाळी ५.१० वाजेच्या सुमारास निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाणी सोडण्यात आले. दरम्यान, पावसाचा ताण पडल्याने परिस्थिती गंभीर आहे. धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून शेतकºयांनी सोडलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा. परंतु, अपव्यय करु नये, असे आवाहन माजलगाव कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी केले आहे. दहा दिवस कालव्यांना पाणी राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.