शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर...!

By admin | Updated: March 14, 2016 00:35 IST

रवी गात , अंबड जालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.

रवी गात , अंबडजालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. दोन्ही शहरांतील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षा रामभरोसे असून, जालना व अंबड पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे. लोकमतने रविवारी सकाळी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब उघडकीस आली. सदर प्रतिनिधी संपूर्ण जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करत असताना कोणीही त्यास आत जाण्यापासून हटकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या जलशुध्दीकरण केंद्राच्या शुध्दीकरण करण्यात आलेल्या पाण्यावर पाणी माफिया डल्ला मारत असल्याचेही यावेळी आढळून आले.अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जालना शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१० कोटी रुपये खर्चुन जायकवाडी-जालना ही योजना पूर्णत्वास आली. जालना शहरात ७ मे २०१३ रोजी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ही योजना कार्यान्वित झाली. सध्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून जालना शहरातील सुमारे ४ लाख नागरिकांसाठी दररोज २० एमएलडी तर अंबडमधील ३१ हजार ५२१ नागरिकांसाठी दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेची क्षमता तब्बल ६५ एमएलडी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच भविष्यात जालना व अंबड या दोन्ही शहरांची लोकसंख्या आजच्या साडेचार पट वाढली तरीही या योजनेतुन पाणीपुरवठा करता येऊ शकेल. अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी तयार केलेल्या जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द झालेले पाणी जालना शहराकडे पाठविण्यासाठी पंपहाऊसची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले आहेत. सध्या यापैकी केवळ दोन पंप सुरु असून, उर्वरित चार पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. केंद्राला असलेले कुंपण तुटलेले असून, पूर्णपणे निरुपयोगी झालेले आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रात सर्व दिशांनी प्रवेश करता येतो. जलशुध्दीकरण केंद्राला काटेरी झुडपांचा वेढा पडला आहे. या केंद्रावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ कशी अवस्था झालेली आहे. कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाण्यास याठिकाणी मुभा आहे. शहरातील नागरिक या केंद्रात येऊन हवे तेव्हा शुध्दीकरण केलेले पाणी घेऊन जातात, यासाठी विशेष नळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे ज्याठिकाणी जलशुध्दीकरण करण्यात येते त्याठिकाणी जाऊन सदर प्रतिनिधीने जाऊन सहजरीत्या छायाचित्रे काढली. ज्या ठिकाणाहून सव्वाचार लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते, अशा महत्वाच्या ठिकाणी एवढी बेपर्वाई कशी असू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जालना आणि अंबड शहरातील जवळपास साडेचार लाख नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.