शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर...!

By admin | Updated: March 14, 2016 00:35 IST

रवी गात , अंबड जालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.

रवी गात , अंबडजालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. दोन्ही शहरांतील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षा रामभरोसे असून, जालना व अंबड पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे. लोकमतने रविवारी सकाळी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब उघडकीस आली. सदर प्रतिनिधी संपूर्ण जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करत असताना कोणीही त्यास आत जाण्यापासून हटकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या जलशुध्दीकरण केंद्राच्या शुध्दीकरण करण्यात आलेल्या पाण्यावर पाणी माफिया डल्ला मारत असल्याचेही यावेळी आढळून आले.अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जालना शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१० कोटी रुपये खर्चुन जायकवाडी-जालना ही योजना पूर्णत्वास आली. जालना शहरात ७ मे २०१३ रोजी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ही योजना कार्यान्वित झाली. सध्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून जालना शहरातील सुमारे ४ लाख नागरिकांसाठी दररोज २० एमएलडी तर अंबडमधील ३१ हजार ५२१ नागरिकांसाठी दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेची क्षमता तब्बल ६५ एमएलडी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच भविष्यात जालना व अंबड या दोन्ही शहरांची लोकसंख्या आजच्या साडेचार पट वाढली तरीही या योजनेतुन पाणीपुरवठा करता येऊ शकेल. अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी तयार केलेल्या जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द झालेले पाणी जालना शहराकडे पाठविण्यासाठी पंपहाऊसची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले आहेत. सध्या यापैकी केवळ दोन पंप सुरु असून, उर्वरित चार पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. केंद्राला असलेले कुंपण तुटलेले असून, पूर्णपणे निरुपयोगी झालेले आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रात सर्व दिशांनी प्रवेश करता येतो. जलशुध्दीकरण केंद्राला काटेरी झुडपांचा वेढा पडला आहे. या केंद्रावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ कशी अवस्था झालेली आहे. कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाण्यास याठिकाणी मुभा आहे. शहरातील नागरिक या केंद्रात येऊन हवे तेव्हा शुध्दीकरण केलेले पाणी घेऊन जातात, यासाठी विशेष नळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे ज्याठिकाणी जलशुध्दीकरण करण्यात येते त्याठिकाणी जाऊन सदर प्रतिनिधीने जाऊन सहजरीत्या छायाचित्रे काढली. ज्या ठिकाणाहून सव्वाचार लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते, अशा महत्वाच्या ठिकाणी एवढी बेपर्वाई कशी असू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जालना आणि अंबड शहरातील जवळपास साडेचार लाख नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.