शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

पाणीयोजनांचे ग्रहण सुटणार !

By admin | Updated: October 31, 2016 00:03 IST

वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता कात टाकणार आहेत.

बीड : कुठे पाईप लाईनला गळती... कोठे विद्युत पंप चोरीला गेलेले... काही ठिकाणी तांत्रिक बिघाड... अशा वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता कात टाकणार आहेत. राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजनांच्या दुरुस्तीला हिरवा कंदील दाखविला असून जिल्हा परिषदेमार्फत १८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनविणे सुरु आहे. जिल्ह्यात पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, त्यापैकी काही २५-३० वर्षांपूर्वीच्या आहेत. या योजनांना गेल्या काही वर्षांपासून समस्यांचे ग्रहण लागले. त्यामुळे योजनेवर विसंबून असलेल्या गावांनाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुश्की ओढवली होती. या योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जि.प. मार्फत शासनाकडे पाठविला होता. दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजना राबवितानाच जुन्या प्रादेशिक योजनांना गतवैभव प्राप्त करून देण्याचे धोरण ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या आसरडोह (ता. धारूर), पट्टी वडगाव नऊ गावे (ता. अंबाजोगाई) केज-धारूर बारा गावे, पूस वीसखेडी या योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार आहेत. सोबतच अंबाजोगाई तालुक्यातील संगम १८ खेडी या योजनेचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. या सर्व योजनांसाठी १७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)