शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयोजनांचे ग्रहण सुटणार !

By admin | Updated: October 31, 2016 00:03 IST

वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता कात टाकणार आहेत.

बीड : कुठे पाईप लाईनला गळती... कोठे विद्युत पंप चोरीला गेलेले... काही ठिकाणी तांत्रिक बिघाड... अशा वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता कात टाकणार आहेत. राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजनांच्या दुरुस्तीला हिरवा कंदील दाखविला असून जिल्हा परिषदेमार्फत १८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनविणे सुरु आहे. जिल्ह्यात पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, त्यापैकी काही २५-३० वर्षांपूर्वीच्या आहेत. या योजनांना गेल्या काही वर्षांपासून समस्यांचे ग्रहण लागले. त्यामुळे योजनेवर विसंबून असलेल्या गावांनाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुश्की ओढवली होती. या योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जि.प. मार्फत शासनाकडे पाठविला होता. दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजना राबवितानाच जुन्या प्रादेशिक योजनांना गतवैभव प्राप्त करून देण्याचे धोरण ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या आसरडोह (ता. धारूर), पट्टी वडगाव नऊ गावे (ता. अंबाजोगाई) केज-धारूर बारा गावे, पूस वीसखेडी या योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार आहेत. सोबतच अंबाजोगाई तालुक्यातील संगम १८ खेडी या योजनेचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. या सर्व योजनांसाठी १७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)