शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

जायकवाडीतील पाण्याची नासाडी

By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST

तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे वभिागाअंतर्गत असलेल्या पैठण डाव्या कालव्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे वभिागाअंतर्गत असलेल्या पैठण डाव्या कालव्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, ही नासाडी थांबविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाहीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.उत्तर पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या या डाव्या कालव्यामधून २८ नोव्हेंबर २०१६ पासून रबी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कापूस, मका आदी पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून हे पाणी सोडण्यात असून, आतापर्यंत घनसावंगी तालुक्यातील कॅनॉल अंतर्गत वितरिकांची पाणीपाळी संपून गेली आहे. परंतु, पाणीपाळी संपलेल्या या वितरिका कागदोपत्री बंद दाखविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे हे पाणी उपवितरिकांमार्फत नद्या, नाले व ओढ्यांना जात असल्याचे चित्र आहे.जायकवाडीचे अनेक शाखा अभियंता हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे शेतकरीही लागेल त्या वेळी पाणी घेत असून, यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. ही नासाडी अशीच सुरू राहिल्यास नाथसागरातील पाणीपातळी झपाट्याने कमी होवू शकते. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातडीने पाण्याची होत असलेली नासाडी थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)