शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीला बळकट करण्यासाठी जलसंधारण कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:06 IST

औरंगाबाद : उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजित उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला ...

औरंगाबाद : उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजित उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी कृती आराखडा जलसंधारण विभागातर्फे तयार केल्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवारी सांगितले.

जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आमची माणसे या दोनदिवसीय बुद्धिमंथन कार्यशाळेचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, अपर मुख्य सचिव नंदकुमार, मनरेगा आयुक्त शंतनू गोयल, वाल्मीचे प्रभारी महासंचालक मधुकर आर्दड, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते. जलसंधारणमंत्री गडाख म्हणाले, राज्याच्या शाश्वत विकासासाठी उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा सुयोग्य वापर आणि त्यासाठीचे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. राज्याचा, कृषी क्षेत्राचा आणि पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास साध्य करू शकतो. या प्रशिक्षणामध्ये वाल्मी संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.

जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा योग्य व गरजेपुरताच वापर करण्याचे बंधन आपण प्रत्येकाने पाळले तर उपलब्ध पाणीसाठा आवश्यक प्रमाणात मिळेल.

कार्यशाळेचे प्रास्ताविक नंदकुमार यांनी केले. आर्दड यांनी वाल्मी संस्थेबाबत माहिती दिली. प्रा. पुराणिक यांनी आभार मानले. या कार्यशाळेत मग्रारोहयोची भूमिका, आदर्श गाव संकल्पना, शासन निर्णय, विविध अधिकारी अनुभव, पाणी फाऊंडेशनचे काम मृद व जलसंधारण, स्वयंसेवी संस्थांची भूमिका यासह इतर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

जलसंधारणाला मनरेगाची जोड

रोहयोमंत्री भुमरे म्हणाले, रोहयोअंतर्गत रस्ते, विहिरी, शेततळे, रेशीम लागवडीसह अनेक उपयुक्त कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. मनरेगाची जोड देऊन शेतीविषयक, मृद व जलसंधारणची अधिकाधिक कामे करण्यावर भर देण्यात येईल.