शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

बंधाऱ्यातील पाणी बंदोबस्तात सोडणार

By admin | Updated: July 24, 2014 00:22 IST

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून २४ जुलै रोजी नांदेडसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून २४ जुलै रोजी नांदेडसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात सद्य:स्थितीत २१ दलघमी पाण्याचा साठा आहे. आठ दिवसांपासून पाणी नांदेडला सोडण्यासाठी हालचालींना सुरुवात झालेली आहे. डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडताना वाद होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. डिग्रस बंधाऱ्यातील मुबलक पाणीसाठा पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी गरजेचा आहे. परंतु पाणी सोडण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून फारसा विरोध होत नसल्याने पाणी सोडण्याच्या हालचाली वेगाने झाल्या आहेत. २४ जुलै रोजी नांदेड शहरासाठी ८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी सोडताना मागील वेळेस झालेला विरोध या वेळेस होऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. चोख पोलिस बंदोबस्तात बंधाऱ्याचे दरवाजे टप्याटप्याने उघडून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यासाठी पोलिसांची कुमक बाहेरून बंदोबस्तासाठी येणार आहे. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाणी सोडताना जबाबदार अधिकाऱ्यांना डिग्रसच्या बंधाऱ्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उपलब्ध पाणी साठ्यापैकी जवळपास ४० टक्के पाणी सोडून देण्यात येणार आहे. यामुळे गोदावरीचे पात्र तळ गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)जमावबंदीचे कलम लागू डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडताना स्थानिकांचा विरोध होऊ नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठीच डिग्रस बंधाऱ्यापासून ५०० मीटरच्या आत जमावबंदीचे कलम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या परिसरात स्थानिकांना विरोध करणे कठीण होऊन बसणार आहे. स्थानिकांना एकत्र येता येऊ नये यासाठी ही खेळी करण्यात आलेली आहे. चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याने पाणी सोडताना विरोध होईल की,नाही? हे पाणी सोडतेवेळी समजणार आहे. पाणीटंचाईचे संकटडिग्रस बंधाऱ्यातून आठ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे गोदावरीच्या पात्रात कमी प्रमाणात साठवण राहणार आहे. अगोदरच निसर्गाच्या अवकृपेमुळे पाऊस पडलेला नाही. त्यातच हक्काचे पाणी जाणार असल्याने गोदाकाठच्या गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच पाणीटंचाईचे संकट तालुक्यातील घोंगावत आहे.