शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

१५ दिवसांपासून मिळेना पाणी

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहराला एकावेळी पाणीपुरवठा करण्यासाठी २४ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार सध्या माजलगाव बॅक वॉटरवर आहे. येथून येणाऱ्या जलवाहिनीला सतत काही ना काही अडचणी येतात. परिणामी, शहरातील विविध भागात १५-१५ दिवस पाणी येत नाही. यामध्ये स्वराज्यनगर, बालेपीर, एकनाथनगर यांसह हद्दवाढीत असलेल्या परिसराचा समावेश आहे. वेळेवर पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव होत असल्याने नळाला पाणी येण्यासाठी विलंब होत असल्याचेही समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये बिंदूसरा प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. माजलगाव बॅक वॉटर बीडपासून ६० ते ७० किलोमीटरवर आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी इलेक्ट्रीसिटीची कमतरता भासत असल्याने देखील पाणी आणण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा कमी क्षमतेने विद्युत पुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणारे पंप चालत नाहीत. परिणामी, ठरलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जातो.