शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून मिळेना पाणी

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहराला एकावेळी पाणीपुरवठा करण्यासाठी २४ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार सध्या माजलगाव बॅक वॉटरवर आहे. येथून येणाऱ्या जलवाहिनीला सतत काही ना काही अडचणी येतात. परिणामी, शहरातील विविध भागात १५-१५ दिवस पाणी येत नाही. यामध्ये स्वराज्यनगर, बालेपीर, एकनाथनगर यांसह हद्दवाढीत असलेल्या परिसराचा समावेश आहे. वेळेवर पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव होत असल्याने नळाला पाणी येण्यासाठी विलंब होत असल्याचेही समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये बिंदूसरा प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. माजलगाव बॅक वॉटर बीडपासून ६० ते ७० किलोमीटरवर आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी इलेक्ट्रीसिटीची कमतरता भासत असल्याने देखील पाणी आणण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा कमी क्षमतेने विद्युत पुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणारे पंप चालत नाहीत. परिणामी, ठरलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जातो.