शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

१५ दिवसांपासून मिळेना पाणी

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीड शहरातील विविध भागात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. यामुळे पावसाळ्यात टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहराला एकावेळी पाणीपुरवठा करण्यासाठी २४ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार सध्या माजलगाव बॅक वॉटरवर आहे. येथून येणाऱ्या जलवाहिनीला सतत काही ना काही अडचणी येतात. परिणामी, शहरातील विविध भागात १५-१५ दिवस पाणी येत नाही. यामध्ये स्वराज्यनगर, बालेपीर, एकनाथनगर यांसह हद्दवाढीत असलेल्या परिसराचा समावेश आहे. वेळेवर पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव होत असल्याने नळाला पाणी येण्यासाठी विलंब होत असल्याचेही समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये बिंदूसरा प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. माजलगाव बॅक वॉटर बीडपासून ६० ते ७० किलोमीटरवर आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी इलेक्ट्रीसिटीची कमतरता भासत असल्याने देखील पाणी आणण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा कमी क्षमतेने विद्युत पुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणारे पंप चालत नाहीत. परिणामी, ठरलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जातो.