शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

गेवराई तालुक्यातील ओसाड जमीन बनली सुपीक

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे.

 दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे. आता मात्र शेतकरी या माळरानाच्या जमिनीत गाळ टाकून माळरान फुलवित आहेत. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी तलवाडा तलावातील गाळ टाकला आहे. यामुळे ओसाड जमीन सुपीक झाली आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. या आपत्तीकडे प्रशासनासह शेतकर्‍यांनी संधी म्हणून पाहिले. जिल्ह्यातील अनेक तलाव तीस ते चाळीस वर्षापासून गाळाने खचाखच भरले होते. यामुळे तलावाचे क्षेत्र मोठे असले तरी सिंचन होत नव्हते तसेच या गाळामुळे तयार झालेल्या जमिनीवर अनेकांनी शेती कसण्यास सुुरुवात केली होती. गेल्यावर्षी दुष्काळात सर्वच तलाव कोरडेठाक पडले होते. यावेळी प्रशासनाने लोकसहभागातून तब्बल ११७ प्रकल्पातील १ कोटी ब्रास गाळ काढला. या गाळामुळे अनेकांची माळरानाची जमीन सुपीक झाली. गेल्यावर्षी तलवाडा येथे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शेतकर्‍यांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यानंतर अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात गाळ टाकला. परिणामी तलवाडा तलावात पाणीसाठा तर मोठ्या प्रमाणावर झालाच शिवाय शेतकर्‍यांच्या उत्पादनातही वाढ झाली. यावर्षीही तलवाडा तलावातून गाळ काढण्यास प्रशासन प्रोत्साहन देत आहे. यामुळे शेतकरी स्वखर्चातून आपल्या जमिनीत गाळ टाकत आहेत. या कामाची रविवारी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक शेतकर्‍यांशी संवादही साधला. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी गाळ टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. या तलावातील गाळ काढण्यास काही अडचणी येत आहेत का? कोणी मनाई करीत आहे का? याची विचारणाही यावेळी त्यांनी शेतकर्‍यांकडे केली. तसेच प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी कशा पद्धतीने गाळ टाकत आहेत, याची पाहणीही केली. बारवाला मुबलक पाणी तलवाडा येथील बारव उन्हाळा लागताच कोरडाठाक पडत होता. गेल्यावषी तलवाडा तलावातील गाळ काढल्याने येथे मोठ्या प्रमाणात सिंचन झाले. परिणामी परिसरातील बारव, विहिरी, कूपनलिका यांचीही पाणीपातळी वाढली. आता कडक उन्हाळा असला तरी येथील तलावाला मुबलक पाणी आहे. यावर्षी गावात पाणीटॅँकरचीही गरज भासली नसल्याचे अंकुश थोरात, योगेश नरसाळे यांनी सांगितले. गाळाने जमीन सुपीक करावी शेतामध्ये तलावातील गाळ टाकल्यास माळरान, मुरमाड असलेल्या जमिनीचा पोत सुधारतो. तलवातील गाळ काढल्यामुळे तलावामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचते शिवाय पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे परिसरातील पाणीप्रश्नही मिटतो. गाळ टाकलेली जमीन चिबडत नाही तसेच येथे तन, गवतही कमी प्रमाणात उगते. गाळामुळे जमिनीची उत्पादकताही वाढते. यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणावर तलावातील गाळ जमिनीत टाकावा, असे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले. उत्पादनात झाली वाढ तलवाडा परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी गेल्यावर्षी शेतात गाळ टाकला होता. यानंतर अनेकांनी फळबाग केल्या तर काहींनी कपाशीचे पीक घेतले. ज्या मुरमाड जमिनीत एकरी पाच क्विंटलही कापूस होत नव्हता, तेथे गाळ टाकल्यानंतर वीस क्विंटल कापूस निघाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शाम कुंड यांनी सांगितले.