शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई तालुक्यातील ओसाड जमीन बनली सुपीक

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे.

 दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे. आता मात्र शेतकरी या माळरानाच्या जमिनीत गाळ टाकून माळरान फुलवित आहेत. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी तलवाडा तलावातील गाळ टाकला आहे. यामुळे ओसाड जमीन सुपीक झाली आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. या आपत्तीकडे प्रशासनासह शेतकर्‍यांनी संधी म्हणून पाहिले. जिल्ह्यातील अनेक तलाव तीस ते चाळीस वर्षापासून गाळाने खचाखच भरले होते. यामुळे तलावाचे क्षेत्र मोठे असले तरी सिंचन होत नव्हते तसेच या गाळामुळे तयार झालेल्या जमिनीवर अनेकांनी शेती कसण्यास सुुरुवात केली होती. गेल्यावर्षी दुष्काळात सर्वच तलाव कोरडेठाक पडले होते. यावेळी प्रशासनाने लोकसहभागातून तब्बल ११७ प्रकल्पातील १ कोटी ब्रास गाळ काढला. या गाळामुळे अनेकांची माळरानाची जमीन सुपीक झाली. गेल्यावर्षी तलवाडा येथे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शेतकर्‍यांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यानंतर अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात गाळ टाकला. परिणामी तलवाडा तलावात पाणीसाठा तर मोठ्या प्रमाणावर झालाच शिवाय शेतकर्‍यांच्या उत्पादनातही वाढ झाली. यावर्षीही तलवाडा तलावातून गाळ काढण्यास प्रशासन प्रोत्साहन देत आहे. यामुळे शेतकरी स्वखर्चातून आपल्या जमिनीत गाळ टाकत आहेत. या कामाची रविवारी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक शेतकर्‍यांशी संवादही साधला. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी गाळ टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. या तलावातील गाळ काढण्यास काही अडचणी येत आहेत का? कोणी मनाई करीत आहे का? याची विचारणाही यावेळी त्यांनी शेतकर्‍यांकडे केली. तसेच प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी कशा पद्धतीने गाळ टाकत आहेत, याची पाहणीही केली. बारवाला मुबलक पाणी तलवाडा येथील बारव उन्हाळा लागताच कोरडाठाक पडत होता. गेल्यावषी तलवाडा तलावातील गाळ काढल्याने येथे मोठ्या प्रमाणात सिंचन झाले. परिणामी परिसरातील बारव, विहिरी, कूपनलिका यांचीही पाणीपातळी वाढली. आता कडक उन्हाळा असला तरी येथील तलावाला मुबलक पाणी आहे. यावर्षी गावात पाणीटॅँकरचीही गरज भासली नसल्याचे अंकुश थोरात, योगेश नरसाळे यांनी सांगितले. गाळाने जमीन सुपीक करावी शेतामध्ये तलावातील गाळ टाकल्यास माळरान, मुरमाड असलेल्या जमिनीचा पोत सुधारतो. तलवातील गाळ काढल्यामुळे तलावामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचते शिवाय पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे परिसरातील पाणीप्रश्नही मिटतो. गाळ टाकलेली जमीन चिबडत नाही तसेच येथे तन, गवतही कमी प्रमाणात उगते. गाळामुळे जमिनीची उत्पादकताही वाढते. यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणावर तलावातील गाळ जमिनीत टाकावा, असे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले. उत्पादनात झाली वाढ तलवाडा परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी गेल्यावर्षी शेतात गाळ टाकला होता. यानंतर अनेकांनी फळबाग केल्या तर काहींनी कपाशीचे पीक घेतले. ज्या मुरमाड जमिनीत एकरी पाच क्विंटलही कापूस होत नव्हता, तेथे गाळ टाकल्यानंतर वीस क्विंटल कापूस निघाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शाम कुंड यांनी सांगितले.