शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

गेवराई तालुक्यातील ओसाड जमीन बनली सुपीक

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे.

 दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे. आता मात्र शेतकरी या माळरानाच्या जमिनीत गाळ टाकून माळरान फुलवित आहेत. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी तलवाडा तलावातील गाळ टाकला आहे. यामुळे ओसाड जमीन सुपीक झाली आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. या आपत्तीकडे प्रशासनासह शेतकर्‍यांनी संधी म्हणून पाहिले. जिल्ह्यातील अनेक तलाव तीस ते चाळीस वर्षापासून गाळाने खचाखच भरले होते. यामुळे तलावाचे क्षेत्र मोठे असले तरी सिंचन होत नव्हते तसेच या गाळामुळे तयार झालेल्या जमिनीवर अनेकांनी शेती कसण्यास सुुरुवात केली होती. गेल्यावर्षी दुष्काळात सर्वच तलाव कोरडेठाक पडले होते. यावेळी प्रशासनाने लोकसहभागातून तब्बल ११७ प्रकल्पातील १ कोटी ब्रास गाळ काढला. या गाळामुळे अनेकांची माळरानाची जमीन सुपीक झाली. गेल्यावर्षी तलवाडा येथे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शेतकर्‍यांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यानंतर अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात गाळ टाकला. परिणामी तलवाडा तलावात पाणीसाठा तर मोठ्या प्रमाणावर झालाच शिवाय शेतकर्‍यांच्या उत्पादनातही वाढ झाली. यावर्षीही तलवाडा तलावातून गाळ काढण्यास प्रशासन प्रोत्साहन देत आहे. यामुळे शेतकरी स्वखर्चातून आपल्या जमिनीत गाळ टाकत आहेत. या कामाची रविवारी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक शेतकर्‍यांशी संवादही साधला. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी गाळ टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. या तलावातील गाळ काढण्यास काही अडचणी येत आहेत का? कोणी मनाई करीत आहे का? याची विचारणाही यावेळी त्यांनी शेतकर्‍यांकडे केली. तसेच प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी कशा पद्धतीने गाळ टाकत आहेत, याची पाहणीही केली. बारवाला मुबलक पाणी तलवाडा येथील बारव उन्हाळा लागताच कोरडाठाक पडत होता. गेल्यावषी तलवाडा तलावातील गाळ काढल्याने येथे मोठ्या प्रमाणात सिंचन झाले. परिणामी परिसरातील बारव, विहिरी, कूपनलिका यांचीही पाणीपातळी वाढली. आता कडक उन्हाळा असला तरी येथील तलावाला मुबलक पाणी आहे. यावर्षी गावात पाणीटॅँकरचीही गरज भासली नसल्याचे अंकुश थोरात, योगेश नरसाळे यांनी सांगितले. गाळाने जमीन सुपीक करावी शेतामध्ये तलावातील गाळ टाकल्यास माळरान, मुरमाड असलेल्या जमिनीचा पोत सुधारतो. तलवातील गाळ काढल्यामुळे तलावामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचते शिवाय पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे परिसरातील पाणीप्रश्नही मिटतो. गाळ टाकलेली जमीन चिबडत नाही तसेच येथे तन, गवतही कमी प्रमाणात उगते. गाळामुळे जमिनीची उत्पादकताही वाढते. यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणावर तलावातील गाळ जमिनीत टाकावा, असे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले. उत्पादनात झाली वाढ तलवाडा परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी गेल्यावर्षी शेतात गाळ टाकला होता. यानंतर अनेकांनी फळबाग केल्या तर काहींनी कपाशीचे पीक घेतले. ज्या मुरमाड जमिनीत एकरी पाच क्विंटलही कापूस होत नव्हता, तेथे गाळ टाकल्यानंतर वीस क्विंटल कापूस निघाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शाम कुंड यांनी सांगितले.