शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

शहराच्या पाणीपुरवठ्याला ‘हाय अलर्ट’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:41 IST

छावणी भागात दूषित पाण्यामुळे तब्बल २७०० नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मनपाच्या पाणीपुरवठ्याला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी भागात दूषित पाण्यामुळे तब्बल २७०० नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मनपाच्या पाणीपुरवठ्याला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले असून, छावणी भागात नागरिकांना गॅस्ट्रो कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी मनपाच्या शहर अभियंत्यांकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. २४ तासांमध्ये अहवाल द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.महापालिका जायकवाडीहून दररोज १३५ एमएलडी पाणी शहरात आणते. त्यातील ३ ते ४ एमएलडी पाणी मनपा छावणी परिषदेला देते. परिषद आपल्या सोयीनुसार नागरिकांना पाणीपुरवठा करते. शनिवारी रात्री अचानक या भागातील नारिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. अवघ्या ४८ तासांमध्ये रुग्णसंख्या तब्बल २७०० पर्यंत गेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हादरले. सोमवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी छावणीत जाऊन रुग्णांची पाहणी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाही संपूर्णपणे छावणी परिषदेला मदत करीत आहे. औषधीही देण्यात आली आहे. माणुसकीच्या नात्याने महापालिका छावणी परिषदेच्या मदतीला धावून गेल्याचे महापौरांनी पत्रकारांशी नमूद केले.शहरातही गॅस्ट्रोची साथ उद्भवू नये यासाठी हाय अलर्टचा इशारा मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आला. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लाइनमन बांधवांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. छावणी भागात मनपाकडून पाणी कशा पद्धतीने देण्यात येते. खराब व्हॉल्व्ह कोठे होता, दूषित पाण्याचे मिश्रण कुठे झाले, या सर्व प्रश्नांचा शोध घेण्याची जबाबदारी महापौरांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर सोपविली. त्यांनी २४ तासांमध्ये आपला अहवाल द्यावा, असेही सांगण्यात आले.