शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

जागविल्या १९७१ युद्धाच्या आठवणी

By admin | Updated: December 17, 2014 00:00 IST

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या. १३ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना या निमित्ताने शहिदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली. या पिढीने एनसीसी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपले करिअर घडवून राष्ट्रसेवा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मानव विकास मिशनचे कार्याध्यक्ष भास्कर मुंडे, ज्ये. स्वा. सैनिक पन्नालाल गंगवाल, ब्रिगेडियर एस.यू.दशरथ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहिदांना अभिवादन व माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान माजी सैनिक कल्याण कार्यालय, कारगिल स्मृतिवन समिती, समाजभूषण रुंजाजी भारसाखळे कॉलेज, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटस् आॅफ इंडिया व नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मे. डॉ. कडेठाणकर, कॅ . सुरेंद्र सुर्वे, ग्रुप कॅ.नाईक, कर्नल रमेश वाघमारे, नेव्ही कॅ.कार्पाेरल पौलभाटिया, ए.के.पाठक, १९७१ च्या युद्धात सहभागी असलेले सैनिक एजाज शेख, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त केंद्रे, पोलीस अधीक्षक सावंत, शिवाजी चौधरी, गाडेकर, संभाजी गुठ्ठे, जगमोहनसिंग घायाळ, मे.बी.एस.पाठक यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना नगरसेवक भारसाखळे म्हणाले, मागील ४ वर्षांपासून कारगिल स्मृतिवन येथे विजय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी. हेच या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सिव्हिल रिस्पॉन्स टीमच्या के. नताशा जरिन, स्रेहा बक्षी, चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय राठी, अगली गु्रप आॅफ औरंगाबादचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोविंद केंद्रे यांनी केले. राहुल चौतमल व चमूने देशभक्तीपर गिते सादर केली. यशस्वीतेसाठी पंडित केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.