शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जागविल्या १९७१ युद्धाच्या आठवणी

By admin | Updated: December 17, 2014 00:00 IST

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या. १३ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना या निमित्ताने शहिदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली. या पिढीने एनसीसी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपले करिअर घडवून राष्ट्रसेवा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मानव विकास मिशनचे कार्याध्यक्ष भास्कर मुंडे, ज्ये. स्वा. सैनिक पन्नालाल गंगवाल, ब्रिगेडियर एस.यू.दशरथ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहिदांना अभिवादन व माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान माजी सैनिक कल्याण कार्यालय, कारगिल स्मृतिवन समिती, समाजभूषण रुंजाजी भारसाखळे कॉलेज, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटस् आॅफ इंडिया व नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मे. डॉ. कडेठाणकर, कॅ . सुरेंद्र सुर्वे, ग्रुप कॅ.नाईक, कर्नल रमेश वाघमारे, नेव्ही कॅ.कार्पाेरल पौलभाटिया, ए.के.पाठक, १९७१ च्या युद्धात सहभागी असलेले सैनिक एजाज शेख, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त केंद्रे, पोलीस अधीक्षक सावंत, शिवाजी चौधरी, गाडेकर, संभाजी गुठ्ठे, जगमोहनसिंग घायाळ, मे.बी.एस.पाठक यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना नगरसेवक भारसाखळे म्हणाले, मागील ४ वर्षांपासून कारगिल स्मृतिवन येथे विजय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी. हेच या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सिव्हिल रिस्पॉन्स टीमच्या के. नताशा जरिन, स्रेहा बक्षी, चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय राठी, अगली गु्रप आॅफ औरंगाबादचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोविंद केंद्रे यांनी केले. राहुल चौतमल व चमूने देशभक्तीपर गिते सादर केली. यशस्वीतेसाठी पंडित केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.