शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दोन तालुक्यांना माती परिक्षणाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 18, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. जिल्ह्यातील ११२ गावांची जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणीसाठी निवड करण्यात आली होती.

उस्मानाबाद : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. जिल्ह्यातील ११२ गावांची जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. यात ६९ गावांतील ४ हजार ६२८ माती नमुन्यांची तपासणी केली. तर परंडा, व कळंब या दोन तालुक्यातील माती नुमन्यांची तपासणी करण्यात आलेली नाही.मानवी आरोग्याला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलिकडील काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जमिनीची उत्पादकता अनेक कारणांमुळे कमी होत आहे. कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून उत्पादन वाढविता येते. शेतकऱ्यांसाठी हे परीक्षण फायदेशीर ठरते.वास्तविकता माती परीक्षण केल्यानंतरच शेती करणे गरजेचे झाले आहे. मातीचे तीन टप्प्यात तर पाण्याच्या नमुन्यांचे एकाच टप्प्यात परीक्षण केले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात ११२ गावांचा समावेश आहे. सन २0१४-१५ या वषार्साठी ११२ गावांतील ६, ८८३ माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने परीक्षणासाठी पाठविलेल्या ४, ६२८ नमुन्यांचे परीक्षण केले. मात्र, परंडा व कळंब या दोन तालुक्यातील एकाही गावातील माती नुमन्यांचे विश्लेषण पुर्ण झाले नाही. ते मार्च महिन्यामध्ये पुर्ण करण्यात येईल, असे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.जिल्ह्यातील मातीमध्ये १६ घटक आढळून येतात. मुख्य अन्न घटक नत्र, स्फुरद, पालाश, तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आदींचा समावेश असतो. सुक्ष्म अन्नघटकामध्ये लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम व बोरॉन, नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे अन्नघटकामध्ये कार्बन, हायड्रोजन, आॅक्सिजन व क्लोरीन असे सोळा घटक मातीमध्ये असतात. कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतामधील पाणी, मातीत पानांचे परीक्षण महत्वाचे आहे.