शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

निकाल ऑनलाइन भरण्यासाठी बोर्डाकडून लिंक मिळण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:05 IST

-- औरंगाबाद ःकोरोनामुळे राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर शिक्षण मंडळाने निकालासाठी मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले. ७ ते २३ ...

--

औरंगाबाद ःकोरोनामुळे राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर शिक्षण मंडळाने निकालासाठी मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले. ७ ते २३ जुलैदरम्यान अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यात १४ ते २१ दरम्यान निकाल समितीने प्रमाणित केलेले गुण राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरायचे आहे; मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत बोर्डाकडून लिंक मिळाली नसल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

बारावीच्या निकालाची लिंकच बुधवारी सायंकाळपर्यंत मिळाली नाही. विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला. त्यात १३१३ शाळांतून हे निकाल भरले जाणार आहेत. यात कला शाखेचे ५७ हजार ५६५, विज्ञान शाखेचे ८९ हजार ७८९, वाणिज्य शाखेचे १३ हजार ७८९, एमसीव्हीसी शाखेचे ४ हजार ८९२ परीक्षार्थी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४५४ शाळांतून निकाल भरण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू होणे अपेक्षित होते. देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रजनिकांत गरुड म्हणाले की, अद्याप लिंक मिळाली नाही. बोर्डातील अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केली होती; मात्र त्यांना राज्य मंडळाकडून लिंक मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले असून, लिंकची प्रतीक्षा करत आहोत.

---

दहावीच्या त्रुटी दुरुस्ती सुरूच

---

दहावीच्या निकालातील ऑफलाइन त्रुटी, दुरुस्तीची कामे अद्याप संपलेली नाहीत. दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याचे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. तर रिपीटर विद्यार्थ्यांचे गुणपत्रकाच्या त्रुटी सर्वाधिक असून, जितक्या वेळेस परीक्षा दिली. ते गुणपत्र शाळांनी बोर्डात जमा करायला हवे होते. तसे न झाल्याच्या त्रुटी आहेत. निकालातील दुरुस्त्या ऑफलाइन दूर करून राज्य मंडळाकडे दिल्या जात असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.