शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बेसुमार वाळूउपशामुळे गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. वाळू उपशामुळे जिल्ह्यातील लहान - मोठ्या नद्यांचे ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यात बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. वाळू उपशामुळे जिल्ह्यातील लहान - मोठ्या नद्यांचे ‘नदीपण’ हरवत असून अनेक गावांना पुराचा सामना करावा लागल्याचे दिसून आले आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाची कधी न भरून निघणारी हानी होत आहे. शेतजमिनींसह भूजल पातळीवर देखील याचा परिणाम होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी ही मुख्य नदी आहे. याशिवाय पूर्णा, शिवना, खाम याही नद्या आहेत. दुधा, गलहती आणि गिरजा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. नदी पात्रांच्यालगत सुमारे २ लाख एकर पीकक्षेत्र आहे. सर्व मिळून ४३ वाळूचे पट्टे या नदींच्या पात्रात आहेत.

या नद्यांच्या पात्रालगत असलेले वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो आहे. फुलंब्रीतील गिरजा नदीतील वाळू उपशामुळे तीन वर्षांत दोन वेळा महापुराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यावर महसूल आणि पोलीस प्रशासनाने पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीच्या विरोधात जाऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील ८, गंगापूर १, कन्नड ४, वैजापूर ६ तर फुलंब्री तालुक्यातील एका असे २० नदी पात्रातील वाळूठेके परवानगीसाठी पर्यावरण समितीकडे आहेत. यंदा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे नदीपात्रांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे वाळूउपशाला पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

कोट...

पर्यावरण तज्ज्ञांचे मत असे

पर्यावरण तथा जल आणि सिंचन तज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी सांगितले, वाळूपट्टे देतांना मोठा भ्रष्टाचार होत असून पर्यावरणाबाबत कुणीही विचार करीत नाही. भूजल कमी होण्याचे, जलतुटवडा जाणवण्यामागे नद्यांमधील वाळू उपसण्याचे कारण आहे. वाळू नद्यांचा श्वास आहे. राजकीय पाठबळामुळे पर्यावरणरक्षक, अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी पर्यावरणीय ताळमेळ संपविला जात आहे. वाळूचे पर्यावरण दृृष्टीने मोठे महत्त्व आहे. निसर्ग प्रक्रियेमध्ये वाळू तयार होते. त्याला वर्षानुवर्ष लागतात. जिल्ह्यातील नापिकी, दुष्काळ आणि भूजल पातळी कमी होण्यास बेकायदेशीररीत्या होणारा वाळूउपसा जबाबदार आहे.