शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वाळूउपशामुळे गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. वाळू उपशामुळे जिल्ह्यातील लहान - मोठ्या नद्यांचे ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यात बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. वाळू उपशामुळे जिल्ह्यातील लहान - मोठ्या नद्यांचे ‘नदीपण’ हरवत असून अनेक गावांना पुराचा सामना करावा लागल्याचे दिसून आले आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाची कधी न भरून निघणारी हानी होत आहे. शेतजमिनींसह भूजल पातळीवर देखील याचा परिणाम होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी ही मुख्य नदी आहे. याशिवाय पूर्णा, शिवना, खाम याही नद्या आहेत. दुधा, गलहती आणि गिरजा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. नदी पात्रांच्यालगत सुमारे २ लाख एकर पीकक्षेत्र आहे. सर्व मिळून ४३ वाळूचे पट्टे या नदींच्या पात्रात आहेत.

या नद्यांच्या पात्रालगत असलेले वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो आहे. फुलंब्रीतील गिरजा नदीतील वाळू उपशामुळे तीन वर्षांत दोन वेळा महापुराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यावर महसूल आणि पोलीस प्रशासनाने पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीच्या विरोधात जाऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील ८, गंगापूर १, कन्नड ४, वैजापूर ६ तर फुलंब्री तालुक्यातील एका असे २० नदी पात्रातील वाळूठेके परवानगीसाठी पर्यावरण समितीकडे आहेत. यंदा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे नदीपात्रांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे वाळूउपशाला पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

कोट...

पर्यावरण तज्ज्ञांचे मत असे

पर्यावरण तथा जल आणि सिंचन तज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी सांगितले, वाळूपट्टे देतांना मोठा भ्रष्टाचार होत असून पर्यावरणाबाबत कुणीही विचार करीत नाही. भूजल कमी होण्याचे, जलतुटवडा जाणवण्यामागे नद्यांमधील वाळू उपसण्याचे कारण आहे. वाळू नद्यांचा श्वास आहे. राजकीय पाठबळामुळे पर्यावरणरक्षक, अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी पर्यावरणीय ताळमेळ संपविला जात आहे. वाळूचे पर्यावरण दृृष्टीने मोठे महत्त्व आहे. निसर्ग प्रक्रियेमध्ये वाळू तयार होते. त्याला वर्षानुवर्ष लागतात. जिल्ह्यातील नापिकी, दुष्काळ आणि भूजल पातळी कमी होण्यास बेकायदेशीररीत्या होणारा वाळूउपसा जबाबदार आहे.