शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST

आडूळ : मागील चार महिन्यांपासून आडूळ येथील महावितरण कंपनीच्या कामधकाऊ वृत्तीमुळे परिसरातील ३५ गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, ...

आडूळ : मागील चार महिन्यांपासून आडूळ येथील महावितरण कंपनीच्या कामधकाऊ वृत्तीमुळे परिसरातील ३५ गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्रस्त नागरिकांनी महावितरणकडे केली आहे.

आडूळ येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रातून परिसरातील ३५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, मागील चार महिन्यांपासून उपकेंद्रात सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिघाड होत असल्याने, वीजपुरवठा तीन-तीन दिवस खंडित राहत आहे. यामुळे आडूळ, रजापूर, देवगाव, ब्राह्मणगाव, गेवराई, घारेगाव, एकतुनी, दाभरूळ परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांचे हाल होत आहे. ३५ गावांतील ग्राहकांना सेवा देण्यासाठी येथील कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असून, एका लाइनमनकडे पाच ते सहा गावांचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. आडूळ गावाची लोकसंख्या बारा हजारांच्या आसपास असून, फक्त येथे एकच लाइनमन काम सांभाळत आहे. त्यामुळे सध्या वीज ग्राहकांना सुरळीत सेवा मि‌ळत नाही. त्यामुळे महावितरणने त्वरित येथील समस्या सोडवावी, अशी मागणी डॉ.गजानन आगलावे, हारुण पठाण, गणेश काळे, संदीप सुरसे, जितेंद्र वायकोस, गजानन मिरगे, विठ्ठल अंतरकर, शेख नजमोद्दीन यांनी केली.

----

मान्सूनपूर्व कामे खोळंबली

महावितरणने मान्सूनपूर्वची कामे केली नसल्याने विजेच्या खांबावर, तसेच गावातील रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने, सलग तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. या व्यतिरिक्त गावात सध्या दररोज सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. त्यातही दिवसभरात किंवा रात्री-अपरात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने, ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागले आहेत.

----

विद्युत तारा व खांब झाले जीर्ण

विद्युत उपकेंद्राचे सन १९७२ मध्ये कामकाज पूर्ण करण्यात आले, तेव्हापासून आजपर्यंतच्या ५० वर्षांच्या कालावधीत जीर्ण झालेल्या विद्युत तारा, तसेच खालून गंजलेले खांब एकदा ही बदलण्याची तसदीही महावितरणने घेतली नाही. सध्या वादळी-वाऱ्याचे दिवस असल्याने हे वीज खांब कोणत्याही क्षणी खाली कोसळून भविष्यात मोठी दुर्घटना भीती निर्माण झाली.

---

गावातील विद्युत रोहित्राची क्षमता कमी व भार जास्त असल्या कारणाने वारंवार रोहित्र जळत आहे, तसेच एका फिटरवर पाच ते सहा गावांचा अतिरिक्त भार असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे.

- महेश कुंभारे, सहायक अभियंता, महावितरण.