शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

ग्रामीणच्या घंटागाड्या शहरात

By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST

जालना : दीड महिन्यांपूर्वी ६२ ग्रामपंचायतींना वितरीत केलेल्या घंटागाड्या परत शहरात आणण्यात आल्याने त्या गावांमधील कचरा कायम आहे.

जालना : दीड महिन्यांपूर्वी ६२ ग्रामपंचायतींना वितरीत केलेल्या घंटागाड्या परत शहरात आणण्यात आल्याने त्या गावांमधील कचरा कायम आहे. मात्र ही वाहने आरटीओकडून परवाना प्राप्त करून घेण्यासाठी आणल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.राज्यात पुणे शहरानंतर जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींना घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले. गावांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने ६२ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात घंटागाड्या खरेदी केल्या. घंटागाड्या सुरू झाल्याने गाव कचरामुक्त होईल, असे वाटत असतानाच या गाड्या परत जालन्यात आणण्यात आल्या. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सध्यातरी बंद आहे.ही सर्व वाहने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. याबाबत जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने असलेली ही नवीन वाहने ठेवण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून आम्ही तेथे वाहने ठेवलेली आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात आणलेल्या ३२ वाहनांची परवान्यासाठी नोंदणी करण्यात आली. परंतु पुन्हा आणलेल्या ३० वाहनांची नोंदणी करताना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ३२ वाहनांनाही त्यासमवेत आणावे, अशी सूचना केली. त्यामुळे ही सर्व वाहने टप्प्याटप्प्याने शहरात आणण्यात आली आहेत. सोमवारी या वाहनांची परवाना नोंदणी अपेक्षित असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)