शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

ग्रामीणच्या घंटागाड्या शहरात

By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST

जालना : दीड महिन्यांपूर्वी ६२ ग्रामपंचायतींना वितरीत केलेल्या घंटागाड्या परत शहरात आणण्यात आल्याने त्या गावांमधील कचरा कायम आहे.

जालना : दीड महिन्यांपूर्वी ६२ ग्रामपंचायतींना वितरीत केलेल्या घंटागाड्या परत शहरात आणण्यात आल्याने त्या गावांमधील कचरा कायम आहे. मात्र ही वाहने आरटीओकडून परवाना प्राप्त करून घेण्यासाठी आणल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.राज्यात पुणे शहरानंतर जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींना घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले. गावांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने ६२ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात घंटागाड्या खरेदी केल्या. घंटागाड्या सुरू झाल्याने गाव कचरामुक्त होईल, असे वाटत असतानाच या गाड्या परत जालन्यात आणण्यात आल्या. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सध्यातरी बंद आहे.ही सर्व वाहने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. याबाबत जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने असलेली ही नवीन वाहने ठेवण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून आम्ही तेथे वाहने ठेवलेली आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात आणलेल्या ३२ वाहनांची परवान्यासाठी नोंदणी करण्यात आली. परंतु पुन्हा आणलेल्या ३० वाहनांची नोंदणी करताना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ३२ वाहनांनाही त्यासमवेत आणावे, अशी सूचना केली. त्यामुळे ही सर्व वाहने टप्प्याटप्प्याने शहरात आणण्यात आली आहेत. सोमवारी या वाहनांची परवाना नोंदणी अपेक्षित असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)