शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

सतर्क पोलिसांनी रोखला बाल विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:54 IST

एका १६ वर्षीय मुलीचा साखरपुड्यातच विवाह होणार असल्याची माहिती मिळताच सतर्क हर्सूल पोलिसांनी तात्काळ मुलीचे घर गाठले. यावेळी आपली चूक वधूपित्याच्या लक्षात आली आणि त्यांनी साखरपुडा आणि विवाहाचा कार्यक्रम रद्द केला. 

ठळक मुद्देआपल्या १६ वर्षीय  मुलीचे  एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह उरकण्याचे ठरवले. वधूपित्याने सारवासारव करीत आज आम्ही केवळ साखरपुडा करणार आहे. मुलीचे लग्न करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ११ : एका १६ वर्षीय मुलीचा साखरपुड्यातच विवाह होणार असल्याची माहिती मिळताच सतर्क हर्सूल पोलिसांनी तात्काळ मुलीचे घर गाठले. यावेळी पोलिसांनी मुलीचे आईवडिल आणि नातेवाईकांना अल्पवयीन मुलीचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे तुम्हाला हा विवाह करता येणार नाही,असे स्पष्ट केले. यावेळी आपली चूक वधूपित्याच्या लक्षात आली आणि त्यांनी साखरपुडा आणि विवाहाचा कार्यक्रम रद्द केला. 

लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष कायद्यानुसार निश्चित करण्यात आले आहे. लग्नाच्या वेळी वधू अथवा वराचे वय कमी असेल तर तो बालविवाह मानला जातो. असा  विवाह  होणे बालविवाह कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. असे असताना आपल्या १६ वर्षीय  मुलीचे  एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने तिच्या आईवडिलांना लागली होती. वय वर्ष १६ हे धोक्याचे असे गमतीने म्हटले जाते. मात्र, या मुलीच्या आईवडिलांना खरेच ते धोक्याचं जाणवू लागल्याने त्यांनी तिचे लग्न ठरविले आणि आज शुक्रवारी साखरपुड्यात तिचा विवाह एका धार्मिक स्थळी उरकण्याची तयारी सुरू केली. 

हर्सूल परिसरातील फुलेनगरात हा विवाह होणार असल्याची कुणकुण हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांना लागली. मात्र कोणाच्या घरी विवाह होणार आहे आणि वधूपित्याचे नाव आणि पत्ताही त्यांना माहित नव्हता. असे असताना पो.नि. कल्याणकर यांनी प्रथम फुलेनगरात सध्या वेशातील पोलिसांना पाठवून असा एखादा विवाह आज होत आहे का, याबाबत खात्री केली. तेव्हा त्यांना वधूपित्याचे आणि मुलीचे नाव कळाले. त्यानंतर कल्याणकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली थेट वधूपित्याचे घर गाठले आणि  मुलीची जन्मदाखला त्यांना सादर करण्याचे सांगितले. तेव्हा वधूपित्याने सारवासारव करीत आज आम्ही केवळ साखरपुडा करणार आहे, मुलीचे लग्न करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

बालविवाह लावणे  कायद्याने गुन्हा आहे,असा सज्जड दम देत पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. मुलीचे वय शिकण्याचे असल्याने तिला शिकवून तिच्या पायावर उभे करा,असा सल्ला त्यांनी दिला. शिवाय वधूपित्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी मुलीच्या पित्याने आणि नातेवाईकांनी पोलिसांचे म्हणने मान्य करीत सध्या त्यांच्या कन्येसाठी वर संशोधन आणि साखरपुडा करणार नसल्याची ग्वाही पोलिसांना दिली.