शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

वेरूळ महोत्सव यंदा घेणारच

By admin | Updated: June 13, 2014 01:12 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहराची सांस्कृतिक ओळख बनलेला वेरूळ महोत्सव गतवर्षी घेता आला नसला तरी यंदा मात्र तो घेणारच, असा निर्धार जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी आज व्यक्त केला.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराची सांस्कृतिक ओळख बनलेला वेरूळ महोत्सव गतवर्षी घेता आला नसला तरी यंदा मात्र तो घेणारच, असा निर्धार जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी आज व्यक्त केला. तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने चालू वर्षात काही नवीन गोष्टी केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सहा वर्षांपूर्वीपर्यंत औरंगाबादेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात वेरूळ महोत्सव भरविला जात होता; मात्र २००८ साली मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामुळे हा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर २००९ मध्ये स्वाईन फ्लू आणि त्यानंतर दोन वर्षे दुष्काळामुळे तो होऊ शकला नाही. २०१२ मध्ये हा महोत्सव भरविण्यात आला. गतवर्षी कोणतेही कारण नसताना हा महोत्सव होऊ शकला नाही. यंदा मात्र आता हा महोत्सव भरविण्यात येणारच असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगितले. महोत्सवासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महोत्सवाची तयारीही लवकरच सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. पहिला वेरूळ महोत्सव १९८६ साली वेरूळ येथे कैलास लेण्याच्या पायथ्याशी पहिला वेरूळ महोत्सव साजरा झाला. पुढे २००२ साली हा महोत्सव औरंगाबादेत स्थलांतरित झाला. तेव्हापासून विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे हा महोत्सव नोव्हेंबर महिन्यात भरविला जातो. आतापर्यंत या महोत्सवात अनेक दिग्गज कलावंतांनी आपली कला सादर केली आहे. यामध्ये हेमामालिनी, उस्ताद बिस्मिल्लाखान, अमिताभ बच्चन, झाकीर हुसेन, शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान, बासरीवादक राणू मुजूमदार आदींचा समावेश आहे. हॉट बलूनसाठी प्रयत्नजिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी वेरूळच्या घाटात हॉट बलूनचा विचार सुरू आहे. पर्यटकांना मोठ्या फुग्यांद्वारे आकाशात जाऊन येथील निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळे पाहता येणार आहेत. हा पर्याय खूप खर्चिक आहे. तरीही एका आंतरराष्ट्रीय कंपनीशी याबाबत प्राथमिक बोलणी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने कंपनीला स्वत: हे बलून खरेदी करून देण्याची तयारी दर्शविली आहे. कंपनीने हे बलून केवळ चालवावेत व त्याचा नफा स्वत: घ्यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे; परंतु अद्याप कंपनीकडून होकार आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. याशिवाय वेरूळ आणि अजिंठा या दोन पर्यटनस्थळांसाठी औरंगाबादेतून दोन व्हॉल्वो बस सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीतून या बसेससाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बसेसच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार म्हणाले.