शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर पंतप्रधान घेणार व्ही.सी.

By admin | Updated: September 24, 2016 00:17 IST

विकास राऊत, औरंगाबाद महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळे केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळे केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. २८ सप्टेंबर रोजी दिल्लीतून पंतप्रधान देशातील सर्व महत्त्वांच्या प्रकल्पांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रशासनाने पंतप्रधानाच्या व्ही. सी. ची मोठी धास्ती घेतली आहे. केंद्रीय दळणवळण खात्याचे १२ प्रकल्प राज्यात सुरू आहेत. त्या प्रकल्पांची गती मंदावली असून, त्यात मराठवाड्यातील सोलापूर-धुळे महामार्गाचा समावेश आहे. प्रकल्प रखडण्याचे नेमके कारण काय आहे. प्रशासन काय करीत आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी काय निर्णय घेत आहेत, या इतर अनेक घटकांचा पंतप्रधान आढावा घेणार असल्यामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेची पाचावर धारण बसली आहे. मंगळवारी आणि बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मुंबई मुख्यालयात बैठक झाली. त्या बैठकीला राज्यातील सर्व प्रकल्प संचालकांनी हजेरी लावली. राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दिल्लीतील प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला होते. वारंवार सूचना करूनही कामांना गती मिळत नसल्यामुळे स्वत: पंतप्रधानांनी ग्राऊंड रिअ‍ॅलिटी चेक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी धास्ती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या कामाला भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी खीळ बसली आहे. दुसरीकडे धुळ्यापर्यंत जाणाऱ्या महामार्गाच्या निविदेचे कामही रखडले आहे. येत्या काही महिन्यांत निविदा अंतिम होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूत्रांनी वर्तविली. १३७२ कोटी रुपयांतून सोलापूर ते उस्मानाबाद मार्गे येडशी ते बीड ते औरंगाबाद ते धुळे, असा हा राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. तुळजापूरपर्यंत रस्त्याचे काम २५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. या महामार्गातील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांचे काम २० टक्के पूर्ण झाले आहे.