शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर पंतप्रधान घेणार व्ही.सी.

By admin | Updated: September 24, 2016 00:17 IST

विकास राऊत, औरंगाबाद महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळे केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळे केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. २८ सप्टेंबर रोजी दिल्लीतून पंतप्रधान देशातील सर्व महत्त्वांच्या प्रकल्पांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रशासनाने पंतप्रधानाच्या व्ही. सी. ची मोठी धास्ती घेतली आहे. केंद्रीय दळणवळण खात्याचे १२ प्रकल्प राज्यात सुरू आहेत. त्या प्रकल्पांची गती मंदावली असून, त्यात मराठवाड्यातील सोलापूर-धुळे महामार्गाचा समावेश आहे. प्रकल्प रखडण्याचे नेमके कारण काय आहे. प्रशासन काय करीत आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी काय निर्णय घेत आहेत, या इतर अनेक घटकांचा पंतप्रधान आढावा घेणार असल्यामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेची पाचावर धारण बसली आहे. मंगळवारी आणि बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मुंबई मुख्यालयात बैठक झाली. त्या बैठकीला राज्यातील सर्व प्रकल्प संचालकांनी हजेरी लावली. राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दिल्लीतील प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला होते. वारंवार सूचना करूनही कामांना गती मिळत नसल्यामुळे स्वत: पंतप्रधानांनी ग्राऊंड रिअ‍ॅलिटी चेक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी धास्ती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या कामाला भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी खीळ बसली आहे. दुसरीकडे धुळ्यापर्यंत जाणाऱ्या महामार्गाच्या निविदेचे कामही रखडले आहे. येत्या काही महिन्यांत निविदा अंतिम होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूत्रांनी वर्तविली. १३७२ कोटी रुपयांतून सोलापूर ते उस्मानाबाद मार्गे येडशी ते बीड ते औरंगाबाद ते धुळे, असा हा राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. तुळजापूरपर्यंत रस्त्याचे काम २५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. या महामार्गातील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांचे काम २० टक्के पूर्ण झाले आहे.