शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

वैजापूर, गंगापूर, पैठणला ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातून गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून,

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातून गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी दिली.नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असून, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातूनही नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातून गोदावरी पात्रात सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांतील नदी काठच्या ४० गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.गोदावरी नदीत येणारे पाणी तसेच नदीला मिळणाऱ्या छोट्या नद्या, उपनद्या व नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह थांबण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर वरील गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत नागरिक, शेतकऱ्यांनी नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी केले आहे.वैजापूरमधील १७ गावांना धोकावैजापूर : तालुक्यात सोमवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरूआहे. नाशिक जिल्ह्याच्या धरणांतील पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने नदी काठच्या १७ गावांत पुराचा धोका वाढला आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले जात आहे. संततधार पावसामुळे या भागातील धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. शिवूर, गारज, लोणी खुर्द, खंडाळा, बोरसर, लासूरगाव, लाडगाव, नागमठाण व महालगाव या महसूल मंडळात सरासरी ९६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. (पान ५ वर)संपूर्ण जिल्हा ओलाचिंबश्रावणसरी : गंगापूर वगळता सर्व तालुक्यांनी ओलांडली सरासरीऔरंगाबाद : आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत औरंगाबाद तालुक्याने पावसात आघाडी घेतली आहे, तर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत गंगापूर वगळता सर्वच ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस झाल्याने ओलेचिंब असे वातावरण झाले आहे. आषाढाची समाप्ती आणि श्रावणाचे आगमन अशा प्रसन्न वातावरणामुळे जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण आहे. २ आॅगस्ट २०१५ रोजी जिल्ह्यात ०.९ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. ७ जूनपासून आजपर्यंत ४६.९० टक्के पावसाची नोंद झाली असून उर्वरित ५८ दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊ स होण्याचा अंदाज आहे. २ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या ६ मि.मी. जास्त पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १९८.७९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा ११८ मि.मी. इतका पाऊस झाल्यामुळे मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच जून, जुलै महिन्याच्या पावसाने सरासरी गाठली आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पावसामुळे जलाशयांमध्ये चांगले पाणी साठवण होण्याची क्षमता आहे. औरंगाबाद तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाला आहे. फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर आणि पैठणमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. वैजापूर तालुक्यात गोदावरी नदी काठावर १७ गावे येतात. यापैकी १० गावांतील शेतवस्ती व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर व पैठण तालुक्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.- निधी पांडे, जिल्हाधिकारीनैसर्गिक आपत्तीची संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी तिन्ही तालुक्यांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. ४वैजापूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, गंगापूर तालुक्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, तर पैठण तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांतील सर्व प्रशासकीय प्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जि.प.च्या अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.