शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ

By admin | Updated: September 26, 2014 00:45 IST

उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ

परभणी: राज्यातील शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटल्याने व काँग्रेस- राष्ट्रवादीची १५ वर्षांची आघाडी बिघडल्याने जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवारीवरुन उलथा-पालथ होणार आहे. शिवसेना- भाजपाची युती व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी यामध्ये फुट पडेल, असे महिनाभरापूर्वी कोणालाही वाटले नव्हते. एवढेच काय गेल्या आठवडाभरापासून यावर चर्चा रतिब सुरु होता. तरीही फुटीची शक्यता चारही पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून महायुतीमध्ये झालेल्या घडामोडीनंतर गुरुवारी महायुती तुटल्याची घोषणा झाली. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस- राष्ट्रवादीचीही आघाडी संपुष्टात आली. त्यामुळे जिल्ह्यात तळ्या-मळ्यात असलेले विविध पक्षातील नेत्यांना आता स्पर्धक पक्षाचे बॅनर मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही नेते त्यांच्या राजकीय पक्षात नाईलाजाने होते. त्यांना आता आधार मिळणार आहे. तर काही नेत्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु, आघाडी- महायुतीतील जागा वाटपाने या इच्छेला मुरड घालावी लागली होती. आता मात्र चारही पक्षातील इच्छुक नेते मोकळे झाले आहेत. जेथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उमेदवारी मिळवू शकतो. तर जेथे भाजपाकडे उमेदवार नव्हता तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उभा राहू शकतो. राष्ट्रवादीचीही अशी स्थिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच गाजणार आहे. शुक्रवार व शनिवार हे दोनच दिवस उमेदवारी दाखल करण्याचे आहेत. या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची उमेदवारी दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता बहुतांश ठिकाणी चौरंगी व पंचरंगी लढती पहावयास मिळणार आहेत. आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या ताकदीपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक ताकद पहावयास मिळणार आहे. यासाठी पडद्यामागे मोठ्या आर्थिक उलाढालीही होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक २०१४ ची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)