शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ

By admin | Updated: September 26, 2014 00:45 IST

उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ

परभणी: राज्यातील शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटल्याने व काँग्रेस- राष्ट्रवादीची १५ वर्षांची आघाडी बिघडल्याने जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवारीवरुन उलथा-पालथ होणार आहे. शिवसेना- भाजपाची युती व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी यामध्ये फुट पडेल, असे महिनाभरापूर्वी कोणालाही वाटले नव्हते. एवढेच काय गेल्या आठवडाभरापासून यावर चर्चा रतिब सुरु होता. तरीही फुटीची शक्यता चारही पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून महायुतीमध्ये झालेल्या घडामोडीनंतर गुरुवारी महायुती तुटल्याची घोषणा झाली. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस- राष्ट्रवादीचीही आघाडी संपुष्टात आली. त्यामुळे जिल्ह्यात तळ्या-मळ्यात असलेले विविध पक्षातील नेत्यांना आता स्पर्धक पक्षाचे बॅनर मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही नेते त्यांच्या राजकीय पक्षात नाईलाजाने होते. त्यांना आता आधार मिळणार आहे. तर काही नेत्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु, आघाडी- महायुतीतील जागा वाटपाने या इच्छेला मुरड घालावी लागली होती. आता मात्र चारही पक्षातील इच्छुक नेते मोकळे झाले आहेत. जेथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उमेदवारी मिळवू शकतो. तर जेथे भाजपाकडे उमेदवार नव्हता तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उभा राहू शकतो. राष्ट्रवादीचीही अशी स्थिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच गाजणार आहे. शुक्रवार व शनिवार हे दोनच दिवस उमेदवारी दाखल करण्याचे आहेत. या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची उमेदवारी दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता बहुतांश ठिकाणी चौरंगी व पंचरंगी लढती पहावयास मिळणार आहेत. आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या ताकदीपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक ताकद पहावयास मिळणार आहे. यासाठी पडद्यामागे मोठ्या आर्थिक उलाढालीही होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक २०१४ ची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)