शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ

By admin | Updated: September 26, 2014 00:45 IST

उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ

परभणी: राज्यातील शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटल्याने व काँग्रेस- राष्ट्रवादीची १५ वर्षांची आघाडी बिघडल्याने जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवारीवरुन उलथा-पालथ होणार आहे. शिवसेना- भाजपाची युती व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी यामध्ये फुट पडेल, असे महिनाभरापूर्वी कोणालाही वाटले नव्हते. एवढेच काय गेल्या आठवडाभरापासून यावर चर्चा रतिब सुरु होता. तरीही फुटीची शक्यता चारही पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून महायुतीमध्ये झालेल्या घडामोडीनंतर गुरुवारी महायुती तुटल्याची घोषणा झाली. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस- राष्ट्रवादीचीही आघाडी संपुष्टात आली. त्यामुळे जिल्ह्यात तळ्या-मळ्यात असलेले विविध पक्षातील नेत्यांना आता स्पर्धक पक्षाचे बॅनर मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही नेते त्यांच्या राजकीय पक्षात नाईलाजाने होते. त्यांना आता आधार मिळणार आहे. तर काही नेत्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु, आघाडी- महायुतीतील जागा वाटपाने या इच्छेला मुरड घालावी लागली होती. आता मात्र चारही पक्षातील इच्छुक नेते मोकळे झाले आहेत. जेथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उमेदवारी मिळवू शकतो. तर जेथे भाजपाकडे उमेदवार नव्हता तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उभा राहू शकतो. राष्ट्रवादीचीही अशी स्थिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच गाजणार आहे. शुक्रवार व शनिवार हे दोनच दिवस उमेदवारी दाखल करण्याचे आहेत. या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची उमेदवारी दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता बहुतांश ठिकाणी चौरंगी व पंचरंगी लढती पहावयास मिळणार आहेत. आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या ताकदीपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक ताकद पहावयास मिळणार आहे. यासाठी पडद्यामागे मोठ्या आर्थिक उलाढालीही होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक २०१४ ची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)